शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा

By admin | Updated: May 22, 2017 01:51 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड

मृतसाठा संपला : आठ दिवसांआड पाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड पाणी पुरवठा करणे प्राधिकरणाला शक्य होणार नाही. त्यामुळे लवकरच आठ दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा असा सल्ला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता कमी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रकल्पातील साठा कमी पडतो. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वेळेपूर्वीच संपून जाते. यंदाही निळोणातील पाणी १५ दिवसापूर्वी संपले. त्यानंतर प्राधिकरणाने प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू केला. आता मृतसाठाही केवळ दोन-तीन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण भिस्त चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर राहणार आहे. चापडोहमध्ये मुबलक पाणी असले तरी पुरेशा प्रमाणात पाणी ओढणारी यंत्रणा प्राधिकरणाकडे नाही. साठवण क्षमता लक्षात घेता प्राधिकरणाला दररोज लागणाऱ्या पाण्यापेक्षा निम्मेच पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. सध्या यवतमाळकरांना तीन दिवसाआड अर्थात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरविले जाते. चापडोहमधून पाणी घेतल्यास यवतमाळकरांना आठ दिवसातून एकदाच पाणी मिळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक भागाला पाणी पोहोचवितानाही मोठी कसरत करावी लागेल. पावसाळ्यात निळोणा धरण ओव्हर-फ्लो होईपर्यंत यवतमाळकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. १६ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता ४निळोणा आणि चापडोह प्रकल्पातून शहराला ३३ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. निळोणातून १६ दशलक्ष लिटर तर चापडोहतून १७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. आता निळोणातील १६ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा थांबेल. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.