शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा

By admin | Updated: May 22, 2017 01:51 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड

मृतसाठा संपला : आठ दिवसांआड पाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड पाणी पुरवठा करणे प्राधिकरणाला शक्य होणार नाही. त्यामुळे लवकरच आठ दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा असा सल्ला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता कमी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रकल्पातील साठा कमी पडतो. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वेळेपूर्वीच संपून जाते. यंदाही निळोणातील पाणी १५ दिवसापूर्वी संपले. त्यानंतर प्राधिकरणाने प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू केला. आता मृतसाठाही केवळ दोन-तीन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण भिस्त चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर राहणार आहे. चापडोहमध्ये मुबलक पाणी असले तरी पुरेशा प्रमाणात पाणी ओढणारी यंत्रणा प्राधिकरणाकडे नाही. साठवण क्षमता लक्षात घेता प्राधिकरणाला दररोज लागणाऱ्या पाण्यापेक्षा निम्मेच पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. सध्या यवतमाळकरांना तीन दिवसाआड अर्थात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरविले जाते. चापडोहमधून पाणी घेतल्यास यवतमाळकरांना आठ दिवसातून एकदाच पाणी मिळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक भागाला पाणी पोहोचवितानाही मोठी कसरत करावी लागेल. पावसाळ्यात निळोणा धरण ओव्हर-फ्लो होईपर्यंत यवतमाळकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. १६ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता ४निळोणा आणि चापडोह प्रकल्पातून शहराला ३३ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. निळोणातून १६ दशलक्ष लिटर तर चापडोहतून १७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. आता निळोणातील १६ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा थांबेल. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.