शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

यवतमाळचा पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:53 IST

फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

ठळक मुद्देप्राधिकरणाची माहिती : निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. गुरुवारपासून निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाला असून चापडोहवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना आणखी आठ दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहरात यंदा अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाने केलेले सर्व उपाय फेल गेल्याने नागरिकांना अक्षरश: पाणी विकत घ्यावे लागले. अशा स्थितीत सर्वांची आशा पावसावर होती. अपेक्षेप्रमाणे मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून यवतमाळ शहरात जोरदार पाऊस बरसला. १० जूनपर्यंत यवतमाळ शहरात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. सतत पाच दिवस कोसळलेल्या या पावसाने यवतमाळ शहराच्या जीवनदायी निळोणा प्रकल्पात जलसाठा झाला. पुरेसा जलसाठा नसला तरी शहराला पाणीपुरवठा होईल एवढे पाणी या प्रकल्पात गोळा झाले आहे. त्यामुळेच जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पात उपलब्ध जलस्रोताचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. या जलसाठ्यावर इमरर्जन्सी पंप बसवून १४ जूनपासून निळोणा धरणावरून होणाºया भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सदर पाणीपुरवठा हा आधीच्याच नियोजनाप्रमाणे राहणार आहे. निळोणा प्रकल्पावरून शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.तर शहरातील दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर येथील टाकीच्या माध्यमातून चापडोह प्रकल्पाचे पाणी पुरविले जाते. त्यापैकी सुयोगनगर आणि लोहारा टाकीत गोखीचे पाणी येत आहे. आता येत्या आठ दिवसात चापडोह धरण परिसरातून पाणीपुरवठा होणाºया भागालाही निळोणातूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी फ्लोटिंग पंप आणि निळोणा व चापडोह पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी आठ दिवसाचा अवधी लागणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. धरणातील उपलब्धतेनुसार यवतमाळ शहरात पाणीपुरवठा कालावधी ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.अखेर निळोणाच धावला मदतीलायवतमाळातील भीषण टंचाई काळातही भ्रष्ट कामकाजामुळे बेंबळा व पर्यायी व्यवस्था असलेल्या गोखी प्रकल्पाचे पाणी संपूर्ण उन्हाळाभर मिळू शकले नाही. पहिल्या पावसातच कोरडा ठण्ण झालेल्या निळोणा प्रकल्पाच्या पातळीत वाढ झाली. जानेवारीपासून टंचाईच्या झळा सोसत असलेल्या यवतमाळकरांच्या मदतीला अखेर निळोणा प्रकल्पच धावून आला. पाणीटंचाई उपाययोजनाचे केवळ यवतमाळात राजकारण करण्यात आले. श्रेयासाठी धडपडत असताना यवतमाळकर पाण्याविना तडफडले.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरण