शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सहकाराच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:57 IST

सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देसहकारी संस्थांचे बळकटीकरण पुणे दुसऱ्या, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. या स्थितीवर मात करून जिल्ह्यातील २४० सहकारी संस्था या अभियानात स्वबळावर उभ्या राहण्यासाठी तयार झाल्या. यातील १२२ सहकारी संस्थांनी स्वत:चा स्वनिधी वापरून व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात संस्थेने स्वत:चा निधी गुंतवून उत्पन्न वाढविले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ९० टक्के संस्थांचा व्यवसाय केवळ कर्ज वितरण करणे आणि तो वसूल करणे एवढाच होता. आता अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड सहकारी संस्थांनी केली आहे.रासायनिक खत विक्री, आरो वॉटर, माती परीक्षण प्रयोगशाळा, गाव पातळीवर एटीएम, गांडूळ खत निर्मिती, क्लिनींग ग्रेडींग युनिट या व्यवसायासह अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. पूर्वी या संस्था ‘ब’ आणि ‘क’ आॅडिटमध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे निधी नसल्याने त्या अवसायनात जाण्याचा धोका होता. मात्र आता महाअभियानामुळे या संस्था नव्याने कामाला लागल्या. यातून गाव पातळीवरील सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन होत आहे. त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मिळणार आहे.या अभियानात राज्यात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे अवसायनात पडलेल्या संस्थांना बळकट करण्यात पुणे आणि मुंबईदेखील मागे पडले आहेत. सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करण्यास गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात विदर्भातील यवतमाळ प्रथमच पुढे आले. पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.क्रांतीदिनी यवतमाळचा पुण्यात सत्कारसहकार आयुक्तालयाने ९ ऑगस्टला पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहकार मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ.राजाराम दहे उपस्थित होते. त्यांनी अटल महापणन अभियानातील यवतमाळ जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक अक्षय देशमुख यांचा सत्कारही केला.योजनेच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यातून सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल. गावांचा विकास होण्यास मदत होईल.- अर्चना माळवीजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

टॅग्स :Governmentसरकार