शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:57 IST

सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देसहकारी संस्थांचे बळकटीकरण पुणे दुसऱ्या, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. या स्थितीवर मात करून जिल्ह्यातील २४० सहकारी संस्था या अभियानात स्वबळावर उभ्या राहण्यासाठी तयार झाल्या. यातील १२२ सहकारी संस्थांनी स्वत:चा स्वनिधी वापरून व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात संस्थेने स्वत:चा निधी गुंतवून उत्पन्न वाढविले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ९० टक्के संस्थांचा व्यवसाय केवळ कर्ज वितरण करणे आणि तो वसूल करणे एवढाच होता. आता अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड सहकारी संस्थांनी केली आहे.रासायनिक खत विक्री, आरो वॉटर, माती परीक्षण प्रयोगशाळा, गाव पातळीवर एटीएम, गांडूळ खत निर्मिती, क्लिनींग ग्रेडींग युनिट या व्यवसायासह अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. पूर्वी या संस्था ‘ब’ आणि ‘क’ आॅडिटमध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे निधी नसल्याने त्या अवसायनात जाण्याचा धोका होता. मात्र आता महाअभियानामुळे या संस्था नव्याने कामाला लागल्या. यातून गाव पातळीवरील सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन होत आहे. त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मिळणार आहे.या अभियानात राज्यात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे अवसायनात पडलेल्या संस्थांना बळकट करण्यात पुणे आणि मुंबईदेखील मागे पडले आहेत. सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करण्यास गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात विदर्भातील यवतमाळ प्रथमच पुढे आले. पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.क्रांतीदिनी यवतमाळचा पुण्यात सत्कारसहकार आयुक्तालयाने ९ ऑगस्टला पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहकार मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ.राजाराम दहे उपस्थित होते. त्यांनी अटल महापणन अभियानातील यवतमाळ जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक अक्षय देशमुख यांचा सत्कारही केला.योजनेच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यातून सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल. गावांचा विकास होण्यास मदत होईल.- अर्चना माळवीजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

टॅग्स :Governmentसरकार