शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

यवतमाळची चमू पूरग्रस्तांच्या साथीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:29 IST

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । समाजकार्य महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील समाजकार्य महाविद्यालयाने आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती काळात विविध प्रांतात मदतकार्य केले. यावर्षीच्या पूरपरिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांची चमू तेथे प्रत्यक्ष कार्य करणार आहे. यासाठी ९० विद्यार्थ्यांची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. महाविद्यालयातील द्वितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी यासाठी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जलप्रलयाच्या ठिकाणी ही चमू मदत करणार आहे. रविवारी समाजकार्य महाविद्यालयातून मदतफेरी काढली जाईल. मदत साहित्य स्वीकारण्यासाठी विठ्ठलवाडी भागातील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयासह आठ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रपरिषदेला प्रा. घनशाम दरणे, मिनल जगताप आदींची उपस्थिती होती.आपत्ती काळात मदतीचा हातयवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाने देशात निर्माण झालेल्या आपाद्ग्रस्त परिस्थितीत मदतीचा हात दिला आहे. गेली ३५ वर्षांपासून महाविद्यालय यासाठी पुढाकार घेत आहे. २००१ मध्ये गुजरात भूकंप, २००४ मधील त्सुनामी, २००८ मधील बिहार राज्यातील पूर परिस्थिती, २०१८ मध्ये केरळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमू दाखल झाली होती. प्रत्येक ठिकाणी दोन ते चार आठवडेपर्यंत मदतकार्यात सहभाग नोंदविला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.देवराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदतीसाठी रॅलीपूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील काही शाळा पुढे आल्या. विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून २१ हजार रुपयांची मदत गोळा केली. भाऊराव देवराव पाटील शाळा, देवीदास गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि लर्निंग पॉर्इंट इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी रॅली काढली. यावेळी रोख, धान्य, कापड आणि वस्तूरूपात मदत गोळा करण्यात आली. रॅलीसाठी संस्थेचे सचिव अनिल गायकवाड, संचालिका अश्विनी गायकवाड, मुख्याध्यापक देवराव फटींग आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :floodपूर