शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

By अविनाश साबापुरे | Updated: August 28, 2023 13:27 IST

फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले

अविनाश साबापुरे, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३५.७५ टक्के तर बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३७.०३ टक्के आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात या दोन्ही वर्गांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ७१९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६७४ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या फेरपरीक्षेसाठी जिल्ह्यातील ५२९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१३ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि त्यातून केवळ १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत

फेरपरीक्षेचा निकाल कमी लागलेला असतानाच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत आले आहेत. दहावीतील एकूण २४१ उत्तीर्णांपैकी तब्बल २३८ विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली आहे. तर केवळ एकाच विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी घेता आली. बारावीचीही परिस्थिती तशीच आहे. बारावीतील एकंदर १९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२६ जणांना तृतीय श्रेणीच मिळविता आली. मात्र तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह गुण घेत यश संपादन केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाYavatmalयवतमाळ