शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

By अविनाश साबापुरे | Updated: August 28, 2023 13:27 IST

फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले

अविनाश साबापुरे, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३५.७५ टक्के तर बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३७.०३ टक्के आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात या दोन्ही वर्गांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ७१९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६७४ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या फेरपरीक्षेसाठी जिल्ह्यातील ५२९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१३ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि त्यातून केवळ १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत

फेरपरीक्षेचा निकाल कमी लागलेला असतानाच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत आले आहेत. दहावीतील एकूण २४१ उत्तीर्णांपैकी तब्बल २३८ विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली आहे. तर केवळ एकाच विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी घेता आली. बारावीचीही परिस्थिती तशीच आहे. बारावीतील एकंदर १९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२६ जणांना तृतीय श्रेणीच मिळविता आली. मात्र तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह गुण घेत यश संपादन केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाYavatmalयवतमाळ