शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:00 PM

नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत.

ठळक मुद्दे१८ पैकी केवळ पाच किमी पाईप टाकले : शेतातून पाईप नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. या परिस्थितीत बेंबळा प्रकल्पाचे पाणी याहीवर्षी यवतमाळकरांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.निळोणा झाल्यानंतर यवतमाळकरांना गतवर्षी न भूतो अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. लिटरभर पाण्यासाठी तास-दोन तास रांगेत राहावे लागले. आबालवृध्द पाण्यासाठी भटकत होते. गरीब-श्रीमंतीचा भेदही थांबला होता. अपुऱ्या पावसामुळे निळोणा आणि चापडोह प्रकल्प बंद कोरडे पडल्याने हे संकट उभे झाले होते. त्याचवेळी यवतमाळकरांच्या भावनांशी खेळ खेळला गेला. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे पाणी टंचाई काळात यवतमाळकरांना पाजणार, अशा घोषणा सुरू झाल्या. पाईपलाईन टाकून पूर्ण झाली, पण टेस्टिंगमध्येच दगा दिला. अनेक ठिकाणी पाईपच्या चिंधड्या उडाल्या. वल्गना करणाऱ्यांचे तोंड बंद झाले.बेंबळाचे पाणी मिळणार नाही, यावर जून २०१८ मध्ये मोहोर लागली. पाऊस लवकर सुरू झाल्याने टंचाई संपली. पण बेंबळा पूर्णत्वाकडे जाण्याची टंचाई अजूनही कायम आहे. निकृष्ट पाईप पुरविले, पोलिसात तक्रार करा, नवीन पाईप मागा, अशी सारी सोंग ढोंग त्यावेळी झाली. कंपनी अखेर नवीन पाईप देण्यास राजी झाली. मात्र जीवावर आल्यागत पाईपचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत किमान नऊ किलोमीटर पाईप पोहोचणे अपेक्षित होते. केवळ चार किलोमीटरचा पुरवठा झाला. यातून काही ठिकाणी जागा सोडून असे पाच किलोमीटर काम झाले. अर्धीअधिक पाईपलाईन शेतातून गेली आहे. आता तिथे पीक आहे. मागील अनुभव पाहता शेताची नासाडी होऊ देण्याची शेतकºयांची मानसिकता नाही. टाकलेले पाईप काढून नवीन पाईप टाकण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ कंत्राटदाराकडून लावले जात नाही. आहे तेवढ्यात भागविणे सुरू आहे. टाकळी फिल्टर प्लान्टपर्यंत संपूर्ण १८ किलोमीटर पाईप टाकणे अवघ्या दोन महिन्यात कठीण आहे.फिल्टर प्लान्ट ते गोदनी रोड सम्पचीही बोंबाबोंबमोठी उठापटक करून पाईप टाकले तरी, शुध्द पाणी मिळणार नाही. कारण टाकळी येथे फिल्टर प्लान्टचे काम फक्त ५५ टक्के झाले आहे. या प्लान्टवर दररोज ४८ दशलक्ष लीटर पाण्याचे शुध्दीकरण होणार आहे. तेथून गोदणी रोडवरील टाकीत पाणी साठवण केली जाईल. मात्र ही सोय यावर्षी तरी होणार नाही, हे स्पष्ट आहे. फिल्टर प्लान्टपासून गोदनी रोडवरील सम्पमध्ये पाणी आणण्यासाठी टाकलेल्या सात किलोमीटर लाईनचीही बोंबाबोंब आहे. या लाईनचे टेस्टिंग पूर्ण झालेले नाही. पाण्याची साठवण करण्यासाठी सम्पच्या कामाला हात लागलेला नाही. आता बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना या उन्हाळ्यात मिळणारच नाही. पुढे आणखी किती महिने लागणार याविषयीसुध्दा अनिश्चितता आहे.योजनेची डेडलाईनला अवघे काही महिने‘अमृत’ योजनेचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन आॅक्टोबर २०१९ पर्यंत आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यासाठीचा हा कालावधी आहे. आजपावेतो पाईपलाईन झालेली नाही, फिल्टर प्लान्ट अपूर्ण आहे. शहरात पाईपचे जाळे पसरले नाही. १६ टाक्यांचे काम झालेले नाही. काही ठिकाणची कामे थांबलेली आहेत. कामाची गती अतिशय संथ आहे. या परिस्थितीत डेडलाईनपर्यंत योजना पूर्ण होईल, याविषयी साधार शंका आहे.शहराची पाण्याची गरज पूर्ण होईल एवढे पाणी निळोणा आणि चापडोहमध्ये आहे. अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणारच आहे. ठरलेल्या मुदतीत योजना पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.- मदन येरावार,पालकमंत्री, यवतमाळबेंबळाचे नवीन पाईप सहा किलोमीटरपर्यंत टाकले आहे. कंपनीकडून अपेक्षेप्रमाणे पाईपचा पुरवठा नाही. शिवाय इतरही अडचणी आहेत. यातून मार्ग काढत शहरात लवकरच पाणी आणले जाईल.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा यवतमाळ.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणwater transportजलवाहतूक