शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:10 PM

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा शॉक : पालिकेकडे पथदिव्यांचे पावणे तीन कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही नगरपरिषदेने थकीत बिलाची रक्कम भरली नाही.यवतमाळ शहरात २३ हजार ५०० पथदिवे आहेत. शहरातील विविध मार्गावर असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री शहरात झगमगाट असतो. मात्र या पथदिव्यांचे नगरपरिषदेने बिल मात्र भरले नाही. यवतमाळ नगरपालिका व संलग्नीत लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव आदी परिसरासह संपूर्ण शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ७७९ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला वारंवार विनंती केली. पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस २३ फेब्रुवारीला बजावण्यात आली. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्यावतीने मौखिक विनंतीही करण्यात आली. परंतु नगरपरिषदेने वीज बिल मात्र भरले नाही. महावितरणने नोटीसमध्ये दिलेला १५ दिवसाचा कालावधीही निघून गेला. परंतु नगरपरिषद कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी वीज वितरण कंपनी बुधवारी यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यवतमाळ शहरात ११५ कनेक्शनवरून वीज पुरवठा केला जातो. नगरपरिषदेने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बिल भरले नाही तर सेक्शन आॅफीसचे कर्मचारी ११५ ठिकाणावरुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला तर शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे.यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठीही खोदकाम करण्यात आले. यामुळे शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. पथदिवे असतानाही खड्ड्यात वाहन उसळून अपघात होत आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना रात्री वाहन चालविणे कठीण होणार आहे. आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.थकीत रक्कम विलीन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीकडीलपथदिव्यांचे थकीत असलेले बहुतांश बिल हे नगरपरिषदेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतींचे आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरालगतच्या लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, भोसा या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यावेळी या ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. आता या ग्रामपंचायतीच्या थकीत वीज बिलाचा भार नगरपरिषदेवर आला आहे. विशेष म्हणजे विलिनीकरणापूर्वीच्या यवतमाळ नगरपरिषदेतील वीज बिल नियमित भरले जात असल्याची माहिती आहे. मात्र आता समाविष्ठ ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलापोटी संपूर्ण शहराला अंधारात जावे लागणार आहे.