शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगर परिषदेच्या घंटागाड्या फसल्या चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:46 IST

नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे.

ठळक मुद्देउपाययोजनेची बोंब : धामणगाव बायपासवर टाकला जातोय कचरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे. धामणगाव मार्गावर पालिकेने अनधिकृत कचरा डेपो थाटला आहे. तेथे पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने शहरातील कचरा घेऊन गेलेल्या घंटागाड्या सोमवारी सकाळी येथे अडकून पडल्या. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्याच्या कडेलाच रिकाम्या करण्यात आल्या आहेत.शहरातून गोळा होणारा कचरा हा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. याबाबत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कठोर नियम केले आहेत. या एकाही नियमाची अंमलबजावणी होत नाही. पालिकेचा हक्काचा असलेला सावरगड येथील कचरा डेपो बंद आहे. येथे कचरा टाकण्यास सावरगड ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असूनही पालिका प्रशासनाने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली नाही. जागा घेण्याबाबतची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणे शक्य नाही. उघड्या जागेवर कचरा फेकून देत शहर स्वच्छतेचा टेंभा नगरपरिषद मिरवत आहे. यामुळे शहरालगतचे बायपास कचरा डेपो बनले आहे. पालिकेने धामणगाव बायपासवर तात्पुरत्या स्वरूपात कचरा ‘डम्प’ करण्यासाठी भाडेतत्वावर जागा घेतली आहे. येथे कचरा टाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. घनकचरा प्रक्रिया नियमांची कोणती अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे भविष्यात भयंकर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागण्याचा धोका आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारमुळेच काळाच्या पडद्याआड गेलेली कॉलराची साथ पुन्हा जिवंत झाली आहे. याने शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. सोमवारी सकाळी एकाच वेळी अनेक घंटागाड्या चिखलात फसल्यामुळे धामणगाव बायपास परिसरात रांगा लागल्या होत्या. ऐन पावसात पुन्हा शहरातील कचरा संकलन कोलमडण्याच्या स्थितीत आहे.पावसाळ्यात साथरोगाची भीतीधामणगाव बायपासवर ज्या ठिकाणी कचरा ‘डम्प’ केला जातो, त्याला लागूनच तलावफैल परिसरतील पंचशिलनगरची वस्ती आहे. शिवाय हा कचरा एका नाल्यात टाकला जात आहे. यामुळे परिसरातील जलस्त्रोत दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसातच या भागात कचºयाचे कृत्रिम पर्वत तयार झाले आहे. हिच स्थिती राहिल्यास लगतच्या परिसरात साथरोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. याचे टक्केवारीत मस्त असलेल्या प्रशासनाला काहीच सोयरसुतक नाही.