शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्ससोबतच्या करारामध्ये फसले यवतमाळचे विमानतळ; १४ वर्षांपासून ठप्प

By विशाल सोनटक्के | Updated: February 23, 2023 11:39 IST

हवाई सेवेला सरकारच्या उदासीनतेचे ग्रहण

यवतमाळ : विमानतळांच्या आधुनिकीकरण देखभाल दुरुस्तीसाठी करार झाल्यानंतर सहाजिकच दर्जेदार विमानसेवा उपलब्ध होईल, अशी यवतमाळकरांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले उलटेच. रिलायन्ससोबत करार केल्यापासून यवतमाळच्या विमानतळाचे कामकाज ठप्प झाले. कहर म्हणजे, करार केल्यानंतर रिलायन्सने ठरल्याप्रमाणे एकही काम केले नाही. मात्र तरीही मागील २४ वर्षांपासून राज्य शासनाला हा करार संपुष्टात आणण्याचे धाडस दाखवता आलेले नाही. पर्यायाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या अडीचशे एकरवरील या विमानतळाला आज माळरानाचे स्वरूप आले आहे. रिलायन्ससोबत करार झालेल्या राज्यातील इतर विमानतळाची अवस्थाही यवतमाळसारखीच झाली आहे.

सर्वाधिक आणि दर्जेदार कापूस पिकविणारा जिल्हा अशी यवतमाळची ओळख आहे. विमानतळामुळे येथील उद्योग व्यवसायाला गती मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील या अपेक्षेने ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी कठोर परिश्रम घेऊन यवतमाळमध्ये विमानतळ उभारले. या विमानतळामुळेच यवतमाळमध्ये पुढे हजारो हातांना काम देणारा रेमण्डसारखा मोठा प्रकल्प आला.

दरम्यान २००८ मध्ये केंद्र शासनाने उडाण योजनेच्या माध्यमातून छोटी शहरे विमानतळाने जोडण्याची योजना जाहीर केली. या योजनेनुसार विमानतळांचे आधुनिकीकरण, अर्थसहाय्य, विकास व देखभाल तसेच दुरुस्ती आणि व्यवस्थापन या अटी आणि शर्तीनुसार २००९ मध्ये यवतमाळसह राज्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद व बारामती या ठिकाणची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे हस्तांतरित केली. सुरुवातीच्या काळात रिलायन्सने या विमानतळावर किरकोळ दुरुस्त्या केल्या. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाहीकडे साफ दुर्लक्ष केले. पर्यायाने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावरील हवाई सेवा मागील २४ वर्षांपासून केवळ कागदावरच राहिली आहे. सध्या या विमानतळाची प्रचंड दुरावस्था झाली असून, रिलायन्स कंपनीचे केवळ दोन वॉचमन या अडीचशे एकरावरील विमानतळाची देखभाल करताना दिसतात.

लातूरमध्ये केवळ मंत्र्यांसाठीच हवाई सेवा

२००८ मध्ये लातूर येथे विमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळावरून नियमित वेळापत्रकानुसार शेवटचे विमान उड्डाण २१ ऑगस्ट २००९ रोजी झाले. त्यानंतर खासगी कंपनीसोबत विमानसेवेचा करार झाला. काही दिवसांनंतर ही सेवा बंद झाली, ती अद्यापही जैसे थे आहे. सध्या मंत्रीमंडळातील महत्त्वाचे व्यक्ती तसेच शासकीय कामानिमित्त येणाऱ्या विमानांची ये-जा सुरू असल्याचे येथील विमानतळाचे व्यवस्थापक राजेश जीवन यांनी सांगितले.

उस्मानाबादमध्ये व्यावसायिक विमानाचे उड्डाणच नाही

उस्मानाबादनजीक खेड येथे १९८४ मध्ये पद्मसिंह पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळाची उभारणी झाली. मात्र निर्मितीपासून ते आजतागायत येथून एकाही व्यावसायिक विमानाचे उड्डाण झालेले नाही. २००९ मध्ये हे विमानतळही रिलायन्स कंपनीकडे भाडे तत्वावर आहे. कोरोनापूर्वी काही काळ येथे खासगी कंपनीकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होते. मात्र त्यानंतर रन-वे बंद असल्याने या ठिकाणीही आता विमान उतरू शकत नाही.

नांदेडातील विमान सेवाही झाली ठप्प

२००८ मध्ये गुरु-ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्ताने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत समावेश करून शहरासाठी अडीच हजार कोटींचा निधी मिळाला. या निधीतील कोट्यवधी रुपये खर्चून नांदेड विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. कोरोनापूर्वी या विमानतळावरून मुंबई, हैदराबाद, औरंगाबादसह दिल्ली, चंदीगड, अमृतसर या ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र एक-एक विमानसेवा बंद होत गेली. आता येथेही नियमित विमानसेवा ठप्प झाली आहे.

टॅग्स :AirportविमानतळYavatmalयवतमाळRelianceरिलायन्स