शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कचऱ्याने यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:47 IST

शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले.

ठळक मुद्देविलगीकरण नावालाच : सीईओंच्या बंगल्यासमोर कचऱ्याचे ढीग, पोलीस लाईनच्या विहिरीत कचरा प्रक्रिया

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. यातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरील परिसर, पोलीस लाईनमधील विहिरीही सुटल्या नाही. एकूणच या कचऱ्याने यवतमाळ नगरपरिषदेतील तमाम पदाधिकारी व प्रशासनाच्या जागरूकता व कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. आधीच यवतमाळ शहर जणू शंभर टक्के खड्डेयुक्त झाले आहे. त्यात आता कचऱ्यामुळे अस्वच्छतेची भर पडल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतो आहे. शहराची ही झालेली अवस्था लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरली आहे. मात्र प्रत्यक्षात या लोकप्रतिनिधींना फारसे सोयरसूतक नसल्याचे त्यांच्या एकूणच चुप्पीवरून दिसून येते. अर्थात, काही लोकप्रतिनिधी याला अपवाद असले तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने त्यांच्या आंदोलनाचा प्रशासनावर काहीएक फरक जाणवत नाही. सावरगडला गांडुळ प्रकल्प आणि धामणगाव रोडवर डम्पिंग यार्ड असले तरी तेथे कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रकल्प नावालाच उरले आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे हे ढिगारे जणू मिनी अनधिकृत डम्पिंग यार्ड बनले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपरिषदेने कचरा विलगीकरणासाठी अभिनव पध्दत शोधून काढली आहे. वसाहतीतील प्रमुख चौक, रस्त्यावर कचºयाचे ढिग टाकले जातात. यात ओला- सुका असा सर्वच प्रकारचा कचरा टाकला जातो. या ढिगावर मोकाट वराह स्वछंदपणे आपले खाद्य शोधून ओला कचरा जागेवरच नष्ट करतात, परिसरात पसरवतात. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी उरलेला कचरा भरून गावाबाहेर नेऊन टाकतात. या पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. तर पालिकेच्या वाढीव क्षेत्रात अपवादानेच कचरा संकलन होत आहे. नागरिकांना घरासमोरच कचरा जाळून नष्ट करावा लागतो. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष आहे.

कचरा विलगीकरणासाठी पालिकेचे वराह पालनस्वच्छतेची बोंबाबोंब, कचऱ्यावर कागदोपत्रीच प्रक्रियाघंटागाडीत वेगळा केलेला कचरा एकाच ट्रॅक्टरमध्येशिळे अन्न उघड्यावरचवाढीव क्षेत्रात कधीतरी फिरतो ट्रॅक्टरघरासमोेर जाळूनच नष्ट केला जातो कचरासेंद्रीय खत र्नििर्मती कुंड दुर्लक्षितहॉटेल, मंगलकार्यालयातील ‘वेस्ट’ रस्त्यावरबँक चौकातील पोच रस्ता बनला डंपिंग यार्ड

टॅग्स :Yavatmalयवतमाळ