शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

पीकविमा ठरला वरळी मटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. ...

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. त्यामुळे पीकविमा शेतकऱ्यांसाठी मृगजळ झाला असून, वरळी मटका ठरत आहे.

ज्या पिकाचा विमा जादा उतरविण्यात आला, अशा पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा मंजूर करताना कंपन्या अनेक किचकट नियम जाणीवपूर्वक घालून भरपाई नाकारतात. उलट ज्या पिकाचा पेरा कमी असतो, अशा पिकाला विमा लाभ मंजूर केला जातो. परिणामी ज्या पिकाचे जादा नुकसान झाले, त्या पिकाला काहीच मिळत नाही. यातून दिवसेंदिवस पीकविमा कंपन्या मालामाल होत आहेत.

आता शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडत आहे. पीक म्हणजे वरळी मटका ठरत असल्याची प्रतिक्रिया कापूस उत्पादक तथा अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केली. गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी उमरखेड विभागातील शेकडो शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यापैकी काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची मदत मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे यावर्षी शेतकरी विमा उतरविण्याबाबत निरुत्साही दिसून येत आहेत.

बॉक्स

कंपनीचे मोबाईल नॉट रिचेबल

उमरखेड विभागात मागील खरीप हंगामात पीक काढणीवेळी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. पीक विमा योजनेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. विम्याचा हप्ता भरला गेला. त्या तुलनेत अत्यल्प लाभ मिळाला. अपात्र शेतकऱ्यांची संख्या जादा असल्यामुळे आता विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विमा उतरविताना अनेक प्रलोभने दिली जातात. मात्र, नुकसानभरपाई देताना विमा कंपनीचे मोबाईल नॉटरिचेबल असतात.

कोट

विमा कंपन्यांकडे ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे जे शेतकरी तक्रार देऊ शकले नाहीत, त्यांना लाभापासून मुकावे लागले. कापूस, सोयाबीन उत्पादक लाभापासून वंचित राहत आहे.

बळीराम राठोड,

शेतकरी, करंजखेड