शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

पीकविमा ठरला वरळी मटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. ...

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. त्यामुळे पीकविमा शेतकऱ्यांसाठी मृगजळ झाला असून, वरळी मटका ठरत आहे.

ज्या पिकाचा विमा जादा उतरविण्यात आला, अशा पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा मंजूर करताना कंपन्या अनेक किचकट नियम जाणीवपूर्वक घालून भरपाई नाकारतात. उलट ज्या पिकाचा पेरा कमी असतो, अशा पिकाला विमा लाभ मंजूर केला जातो. परिणामी ज्या पिकाचे जादा नुकसान झाले, त्या पिकाला काहीच मिळत नाही. यातून दिवसेंदिवस पीकविमा कंपन्या मालामाल होत आहेत.

आता शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडत आहे. पीक म्हणजे वरळी मटका ठरत असल्याची प्रतिक्रिया कापूस उत्पादक तथा अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केली. गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी उमरखेड विभागातील शेकडो शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यापैकी काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची मदत मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे यावर्षी शेतकरी विमा उतरविण्याबाबत निरुत्साही दिसून येत आहेत.

बॉक्स

कंपनीचे मोबाईल नॉट रिचेबल

उमरखेड विभागात मागील खरीप हंगामात पीक काढणीवेळी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. पीक विमा योजनेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. विम्याचा हप्ता भरला गेला. त्या तुलनेत अत्यल्प लाभ मिळाला. अपात्र शेतकऱ्यांची संख्या जादा असल्यामुळे आता विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विमा उतरविताना अनेक प्रलोभने दिली जातात. मात्र, नुकसानभरपाई देताना विमा कंपनीचे मोबाईल नॉटरिचेबल असतात.

कोट

विमा कंपन्यांकडे ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे जे शेतकरी तक्रार देऊ शकले नाहीत, त्यांना लाभापासून मुकावे लागले. कापूस, सोयाबीन उत्पादक लाभापासून वंचित राहत आहे.

बळीराम राठोड,

शेतकरी, करंजखेड