शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

‘सायबर सेफ वुमेन’वर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे.

ठळक मुद्देएसपींचे मार्गदर्शन : सोशल मीडिया वापरताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाने संयुक्तरित्या ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवक-युवतींमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे. या माध्यमातून प्रत्येकजण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. हा आपला अधिकार असला तरी एखाद्या पोस्टमुळे समाज स्वास्थ्याला धोका निर्माण होतो. या जबाबदारीचे भान ठेऊनच सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, अनिल किनगे, मार्गदर्शक रम्या कन्नन, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने आदी उपस्थित होते. सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे. यावरून नागरिकांच्या आवडीनिवडी, चेहऱ्यावरचे हावभाव कंपन्यांच्या लक्षात येतात. याचाच फायदा घेऊन मार्केटिंग केले जाते. समाजकंटक अशा माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे.यावेळी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सायली देवस्थळे, रेखा गुरव, प्रिया उमरे, स्वाती राठोड आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहुतांश जणांना सोशल मीडियाचे व्यसनयावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, १५ वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व्हायचे. आज तंत्रज्ञानाचे विशेष करून सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आपली मानसिकता मोबाईलसोबत जुळली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम