शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा कामगारांचे कामबंद

By admin | Updated: January 5, 2015 23:13 IST

कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़

वणी : कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़ या आंदोलनामुळे वेकोलिच्या १५ खाणींमधील उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी शासनाचे कोट्यधींचे उत्पन्न बुडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोल इंडियाअंतर्गत प्रमुख चार कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. या चारही कंपन्यांमधील कोळसा कामगारांच्या विविध मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी कामगारांनी वारंवार निवेदन दिले. अनेकदा आंदोलनेही केली आहेत. मात्र अद्याप कामगारांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आता कामगारांचा संयम संपत आहे. त्याच अनुषंगाने आता चारही कंपन्यांमधील पाच प्रमुख कामगार संघटनांनी एकत्रित येऊन ६ जानेवापीरपासून पाच दिवसीय कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. कोळसा कंपनीद्वारे खुल्या बाजारात कोळसा विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती समाप्त करावी, अशी कामगारांची मागणी आहे. सोबतच कोळसा ब्लॉक कोल इंडियाला देण्यात यावे, कोल इंडियाचे शेअर विक्री करू नये, कोल इंडियामध्ये ई-अ‍ॅक्शन पध्दत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, कोळसा विक्री मूल्य उत्पादन खर्चावर आधारित समिती गठित करून पाच प्रमुख कामगार संघटनांचा त्यात समावेश करावा, नवीन कामगार भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू करावी, रिक्त पदे तातडीने भरावी व कंत्राटदारी, आऊटसोसिंग पध्दत बंद करावी, अशा मागण्या आहेत.याशिवाय नवीन भूमी अधिग्रहण कायदा पूर्ण रूपात लागू करावा, कामगारांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी, पदवी, पदविकाधारक, आयटीआय उत्तीर्ण कामगारांना बढती द्यावी, आदी मागण्याही कामगारांनी केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मागण्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी कामगारांची अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता प्रमुख पाच कोळसा कामगार संघटनांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.यापूर्वी केवळ सन १९८७ मध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांनी संप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेस आढाडीचे सरकार असताना सतत चार दिवस देशभर कोळसा खाण बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खुद्द काँग्रेसप्रणीत इंटक ही युनियनही संपात सहभागी झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने नमते घेतले होते. मात्र आता सत्ता बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा जुनीच परिस्थिती समोर निर्माण झाली आहे.सध्या केंद्रात भाजपा युतीचे सरकार सत्तारूढ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ‘सबका साथ- सबका विकास‘, अशी ग्वाही दिली होती. मात्र सत्तेवर येताच केंद्र सरकारने कोळसा कामगारांच्या हिताविरुद्ध कार्य सुरू केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळेच भाजपाप्रणीत बीएमएस ही कामगार संघटनासुद्धा या देशव्यापी पाच दिवसीय कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व कोळसा गाणींतील कोळसा उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी वीज केंद्रांना कोळसा मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे देशात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीच यावर काही तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)