शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

By admin | Updated: November 11, 2015 01:52 IST

थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला.

वेतन-बोनस नाही : प्रशासन आणि कामगारांत तणाव वाढला उमरखेड : थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. दिवाळीच्या तोंडावरही कारखाना प्रशासन वेतन देत नसल्याने कामगार चांगलेच संतप्त झाले आहे. यातून कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे.वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत १३ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. वारंवार आंदोलने करूनही प्रशासन उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु अध्यक्षांसह संचालक मंडळाने दखल घेतली नाही. त्यातच कारखान्याने विकलेली साखर नेण्यासाठी मंगळवारी आठ ते दहा ट्रक कारखाना परिसरात आले. कामगारांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी सर्व ट्रक अडविले. एकाही ट्रकला कारखान्याच्या आत प्रवेश करु दिला नाही. काही वेळातच हे सर्व ट्रक परत गेले. विशेष म्हणजे या कारखान्यात एक लाख २२ हजार साखरेच्या गोण्या शिल्लक आहे. त्यातील २५ हजार पोती साखर कारखान्याने विकली आणि तीच साखर नेण्यासाठी मंगळवारी ट्रक आले होते. परंतु कामगारांच्या रौद्ररुपापुढे कुणाचेही काहीच चालले नाही. गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही. त्यातच कामगारांंना १३ महिन्यांपासून पगार नाही. यापूर्वी सतत २८ दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर उमरखेडमध्ये भीक मागो आंदोलनही करण्यात आले. संचालक मंडळाने दोन महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर तीन महिने झाले तरी एकाही कामगाराचा पगार दिला नाही. या दरम्यान अनेकदा निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नसल्याने ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला खासदार अ‍ॅड. राजीव सातव, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, अ‍ॅड. माधवराव माने, भीमराव पाटील, विलास चव्हाण आदींनी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांचा तीव्र रोष कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळावर दिसून आला. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ऊस उत्पादक राम देवसरकर, रमेश चव्हाण, डॉ.वि.ना. कदम यांनी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार वेतनावरच ठाम आहे. दिवाळी सण आला तरी अद्याप वेतन मिळाले नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)