शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीमध्ये कामगारांचे उपोषण सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:37 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात कामगारांचे उपोषण सत्र सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात आहे. सामान्य कामगारांवर होत असलेला अन्याय दबावात की आर्थिक हित जोपासत केला जात आहे, ......

ठळक मुद्देअन्यायाची मालिका : प्रमुख अधिकाऱ्यांकडून परिपत्रकांचा बे्रक डाऊन, नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात कामगारांचे उपोषण सत्र सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलन केले जात आहे. सामान्य कामगारांवर होत असलेला अन्याय दबावात की आर्थिक हित जोपासत केला जात आहे, याचा शोध मध्यवर्ती कार्यालयाने घ्यावा, अशी अपेक्षा कामगारांना आहे.कामगारांची बलाढ्य संघटना असलेल्या कामगार संघटनेलाही न्याय मिळवून घेण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. भर उन्हात या संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दोन दिवस साखळी उपोषण केले. कामगारांचे अनेक प्रश्न असले तरी, बढती आणि बदल्यांमध्ये अन्याय होत असल्याची ओरड आहे. विभाग नियंत्रकांकडून पक्षपाती धोरण राबविले जात असल्याची ओरड आहे. त्याला बराच आधारही आहे.या विभागात बढती व बदल्यांची मोठी घाई सुरू आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात ही प्रक्रिया सुरू आहे. कुणाला लाभ होईल, अशी कृती आचारसंहितेत केली जाऊ नये, असे संकेत आहे. एसटीने मात्र हे संकेत पायदळी तुडविले आहे. बढती, बदलीचे अधिकार असलेल्या अधिकाºयांना ही घाई का व्हावी, हा प्रश्न आहे. परिपत्रक डावलून बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रक पदावर बढती आणि बदली संदर्भात विभाग नियंत्रकांनी घेतलेली भूमिका अनेक शंकांना जन्म देणारी आहे.वाहतूक नियंत्रक पदावर बढती देताना बदलीही करण्यात आली. मात्र यातील काही जण बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही. अंतिम संधीच्या पत्रालाही त्यांनी जुमानले नाही. अखेर एसटीने अशा कामगारांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दिले. यात झालेल्या पक्षपाताविरुध्द एका कामगाराने उपोषण सुरू केले होते. अवघ्या तीन तासात त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. कामगारांवर सातत्याने न्यायासाठी लढा द्यावा लागत आहे. महिनाभरात उपोषणाचे तीन मंडप एसटी विभागीय कार्यालयासमोर पडले. अन्यायाची मालिका कुठेतरी थांबावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यवतमाळ विभागातील सर्व आगार तोट्यात आहेत. नियोजनाचा अभावही या बाबीला कारणीभूत आहे. अधिकाºयांकडून मात्र केवळ कामगारांवर ठपका ठेवला जातो. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी, असा सूर आहे.आचारसंहिता भंगाची तक्रारनिवडणूक आचारसंहिता काळात बदली आणि बढतीचा लाभ दिला जाऊ शकतो काय, असे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांनी याची दखल घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली असल्याची माहिती आहे.

टॅग्स :state transportएसटी