शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वर्गासाठीचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता केवळ २०१४ नंतरच प्रगती झाल्याचा देखावा केला जात असल्याचे सांगत शिंदे यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागासवर्गीयातील काही मोजक्या जणांची प्रगती झाली म्हणजे आरक्षणाची गरज संपली, असे नाही, तर आजही दलित आदिवासी समाजातील कोट्यवधी कुटुंबे हलाखीचे जीवन जगत असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. वीरबापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला प्रगतिशील मार्गावर नेण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. शनिवारी तळेगाव येथे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या पुढाकारातून उभारलेल्या वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके, संध्याताई सव्वालाखे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, आमदार वजाहत मिर्झा, मारोतराव कोवासे, विजय खडसे, आनंद गेडाम, नामदेव उसंडी, जीवन पाटील, प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, भैयासाहेब देशमुख, देवानंद पवार, मनीष पाटील, अशोक बोबडे, अरुण राऊत, जितेंद्र मोघे, दशरथ मडावी, आनंद गेडाम, जावेद अन्सारी, राम देवसरकर, उत्तम गेडाम, विजय मोघे, जया पोटे, सुरेश चिंचोळकर, डाॅ. टी. सी. राठोड, वनमाला राठोड, उन्मेश पुरके, किरण मोघे, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी पारंपरिक वाद्याच्या निनादात सुशीलकुमार शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता केवळ २०१४ नंतरच प्रगती झाल्याचा देखावा केला जात असल्याचे सांगत शिंदे यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. अरविंद वाढोणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उत्तम गेडाम यांनी आभार मानले. यावेळी प्रबोधिनीच्या निर्मितीला हातभार लावणारे राहुल शिंदे, मिलिंद फुटाणे, प्रशांत कुसराम, दीपक कोरांगे, माधुरी मडावी, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, डाॅ. चंद्रशेखर कुडमेथे, संभाजी सरकुंडे, राम चव्हाण, अजय घोडाम, सुनील ढाले, एम. झेड. कुमरे, माधव सरकुंडे, महेश कोडापे यांचा सन्मान करण्यात आला.

न्यायासाठी सनदशीर मार्गाने प्रबोधिनी करणार प्रयत्न- माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी प्रास्ताविक केले. प्रबोधिनीच्या माध्यमातून वंचितांना शिक्षित करण्याचा तसेच सनदशीर मार्गाने न्यायासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, प्रबोधिनी सर्वांसाठी खुली असेल, बहुजन हितासाठी तसेच मानवी जीवनाशी निगडित विषयावर मार्गदर्शन करील, असे सांगितले. तर शिवाजीराव मोघे यांनी भाजप सरकारने बोगस आदिवासींना नियमित करण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली. माणिकराव ठाकरे यांनीही भाजपवर टीका करीत लोकशाही उखडून फेकण्याचे भाजपाचे मनसुबे उधळून लावा, असे आवाहन केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने काळे कृषी कायदे परत घेतले. मात्र जनता भाजपाचा कावा ओळखते, असेही माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे