शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

वर्क ऑर्डर मिळूनही करता येणार नाही कामे, जाणून घ्या कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:08 IST

आचारसंहिता समितीचा 'वॉच' : कंत्राटदारांना करावी लागणार प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेत विकासकामे रखडली जाऊ नये, यासाठी आवश्यक त्या कामांची प्रशासकीय मान्यता घेत वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. मात्र, कंत्राटदारांनी तत्काळ कामे सुरू केली नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने कंत्राटदारांना या कालावधीत कामे करता येणार नाही. आचारसंहिता समितीचाही वॉच राहणार आहे.

लोकसभा निवडणूक काळात विकासकामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला होता. जून महिन्यात आचारसंहिता संपताच कामाचा सपाटा सुरू झाला. त्याला पाच महिने होत नाही तोच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची भीती नेते मंडळीसह प्रशासनात सतावत होती. कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला गेला. यामुळे आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक व दोनकडून विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. वर्क ऑर्डर मिळताच कंत्राटदार बिनधास्त झाले. आता कधीही कामे करता येईल, असे त्यांना वाटू लागले.

काहींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तर, काहींनी आज-उद्यावर जोर दिला आणि आचारसंहिता लागू झाली. ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत कामे सुरू झाल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता देता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. ही कामे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच करता येणार आहे. नागरिकांनाही यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

प्रशासकीय मान्यताही नाही २२ ऑक्टोबरपासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. प्रशासकीय मान्यता झाली असल्यास वर्क ऑर्डर देता येणार नाही.

काय दिले निर्देश ज्या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, अशी कामेही सद्यःस्थितीत सुरू करू नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

"वर्क ऑर्डर मिळाल्यावर ज्यांनी कामांना सुरुवात केली अशी कामे करता येणार आहे. मात्र, ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना काम करता येणार नाही. तशा सूचना करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कालावधीत कामे सुरू केल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येईल." - मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ,

टॅग्स :Code of conductआचारसंहिताYavatmalयवतमाळ