शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वर्क ऑर्डर मिळूनही करता येणार नाही कामे, जाणून घ्या कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:08 IST

आचारसंहिता समितीचा 'वॉच' : कंत्राटदारांना करावी लागणार प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेत विकासकामे रखडली जाऊ नये, यासाठी आवश्यक त्या कामांची प्रशासकीय मान्यता घेत वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. मात्र, कंत्राटदारांनी तत्काळ कामे सुरू केली नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने कंत्राटदारांना या कालावधीत कामे करता येणार नाही. आचारसंहिता समितीचाही वॉच राहणार आहे.

लोकसभा निवडणूक काळात विकासकामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला होता. जून महिन्यात आचारसंहिता संपताच कामाचा सपाटा सुरू झाला. त्याला पाच महिने होत नाही तोच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची भीती नेते मंडळीसह प्रशासनात सतावत होती. कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला गेला. यामुळे आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक व दोनकडून विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. वर्क ऑर्डर मिळताच कंत्राटदार बिनधास्त झाले. आता कधीही कामे करता येईल, असे त्यांना वाटू लागले.

काहींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तर, काहींनी आज-उद्यावर जोर दिला आणि आचारसंहिता लागू झाली. ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत कामे सुरू झाल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता देता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. ही कामे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच करता येणार आहे. नागरिकांनाही यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

प्रशासकीय मान्यताही नाही २२ ऑक्टोबरपासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. प्रशासकीय मान्यता झाली असल्यास वर्क ऑर्डर देता येणार नाही.

काय दिले निर्देश ज्या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, अशी कामेही सद्यःस्थितीत सुरू करू नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

"वर्क ऑर्डर मिळाल्यावर ज्यांनी कामांना सुरुवात केली अशी कामे करता येणार आहे. मात्र, ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना काम करता येणार नाही. तशा सूचना करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कालावधीत कामे सुरू केल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येईल." - मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ,

टॅग्स :Code of conductआचारसंहिताYavatmalयवतमाळ