शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

बेंबळा पाईपलाईनचे काम अद्याप ५५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:39 IST

पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बेंबळाच्या पाण्याकडे नजरा लागून असलेल्या यवतमाळकरांच्या पदरी यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा निराशाच पडली आहे. बेंबळावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळकरांंची तहान भागविण्याच्या कामाची संथगती कायम आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्षात हवे होते ७५ टक्के : संथगतीमुळे कंत्राटदाराला दरदिवशी तीन लाख रूपयांचा दंड प्रस्तावितउरले केवळ पाच महिने, आॅक्टोबरची डेडलाईन टळण्याची चिन्हे, यवतमाळ शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या कायम

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बेंबळाच्या पाण्याकडे नजरा लागून असलेल्या यवतमाळकरांच्या पदरी यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा निराशाच पडली आहे. बेंबळावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळकरांंची तहान भागविण्याच्या कामाची संथगती कायम आहे. आतापर्यंत किमान ७५ टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हे काम ५० ते ५५ टक्क्यापर्यंत आले असून सुमारे २० टक्क्याने माघारले आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळ शहर भीषण पाणीटंंचाईचा सामना करीत आहे. निळोणा व चापडोह या दोन प्रकल्पांमधून शहराची तहान सध्या भागविली जाते. मात्र वाढते शहर, लोकसंख्या, ग्राहक पाहता या धरणांवरून पुरेसे पाणी मिळणे शक्य नाही ही बाब ओळखून यवतमाळ शहरासाठी २७७.५२ कोटींची अमृत योजना आणली गेली. या योजनेतून बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळात पाणी आणायचे व ते शहराला पुरवठा करायचे, असे नियोजन आहे. निविदेतील अटीनुसार आॅक्टोबर २०१९ पर्यंत ही योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता पाईपलाईनचे हे काम वर्षभर आधी पूर्ण करता येते का, या दृष्टीने राजकीय स्तरावरून प्रामाणिक प्रयत्न झाले. मात्र या प्रयत्नांना जलवाहिनीतील साहित्याच्या दर्जा व गुणवत्तेची साथ न मिळाल्याने हे प्रयत्न राजकीय व प्रशासकीय दृष्ट्या चांगलेच अंगलट आले. २०१८ च्या १० मे रोजी मिळणारे पाणी २०१९ ची १० मे जाऊनही अद्याप मिळाले नाही. त्या पार्श्वभूमीवर बेंबळाच्या यवतमाळात आणल्या जाणाऱ्या पाण्याच्या योजनेची नेमकी स्थिती काय हे जाणून घेतले असता हे काम अद्याप अर्ध्यावरच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासकीय सूत्रानुसार, अमृत योजनेतील बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे हे काम सध्यास्थितीत किमान ७५ टक्के पूर्ण झालेले असणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अवघे ५० ते ५५ टक्के हे काम झाले आहे. कंत्राटदार या कामात २० टक्क्याने माघारला आहे. उर्वरित काम करण्यासाठी आता केवळ पाच महिने (आॅक्टोबर २०१९) कंत्राटदाराकडे उरले आहे. दीड-दोन वर्षात कंत्राटदाराला केवळ अर्धे काम करता आले. आता उर्वरित तेवढेच काम केवळ पाच महिन्यांमध्ये कंत्राटदार पूर्ण करू शकेल का? याबाबत खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला साशंकता आहे. म्हणूनच प्राधिकरणाने कामाला झालेल्या विलंबाबाबत सदर कंत्राटदाराला दरदिवशी अडीच ते तीन लाख रुपये या दराने दंड प्रस्तावित केला आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. बेंबळाचे काम करत असलेल्या कंत्राटदाराला अमरावती येथील कामात दंडाची कारवाई सुरू झाली, हे विशेष.बेंबळाचे पाणी सत्तेचे गणित बिघडवणारकंत्राटदाराची बेंबळाच्या कामाची हीच गती राहिल्यास मे २०२० मध्येसुद्धा बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळण्याची शाश्वती वाटत नाही. बेंबळाच्या या विलंबाने येणाऱ्या पाण्याचा राजकीय परिणाम चार महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत दिसण्याची दाट शक्यता आहे. हे बेंबळाचे पाणीच यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या सत्तेचे राजकारण बुडवेल असे भाकित अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण