शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:42 IST

शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या.

ठळक मुद्देघेराव : महिनाभरापासून नळाचा पत्ता नाही

पिंपळगावात टँकर चालकाला बदडलेऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या. वडगाव रोड परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तर सिंघानियानगरात महिलांनी ड्रमसह रस्त्यावर ठिय्या दिला. पिंपळगाव येथे तर महिलांचा दुर्गावतार दिसून आला. पाणी वाटपावरून महिलांनी चक्क टँकर चालकालाच बदडले.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील निरोहीनगर, सारंग सोसायटी, प्रगती सोसायटी, वृंदावननगर, धनलक्ष्मीनगर परिसरात महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी दुपारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या. तेथे कार्यकारी अभियंता अजय बेले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेल्याचे समजले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिला निघाल्या असता जीवन प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावरच बेले दिसताच घेराव घातला. तब्बल तासभर हा घेराव सुरू होता.दरम्यान पिंपळगाव परिसरात पाणी वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या ठिकाणी पाणी वितरणासाठी आलेल्या टँकर चालकाला चांगलेच बदडले. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. तर सिंघानियानगरात महिला पाण्याचे रिकामे ड्रम घेऊन रस्त्यावर ठिय्या देऊन टँकरची प्रतीक्षा करीत होत्या.नगराध्यक्षांंनी केली गोखी प्रकल्पाच्या पाण्याची मागणीयवतमाळातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी लोहारा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाºया गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. टंचाई उग्ररुप धारण केले असून तातडीची उपाययोजना म्हणून लोहारा एमआयडीसीतून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत गोखीचे पाणी आणण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या प्रकल्पातून दर्डानगर टाकीद्वारे पाणी आणले जात होते. पुन्हा ही पाईपलाईन कार्यान्वित करून एक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच वडगाव, लोहारा, वाघापूर, दर्डानगर, दारव्हा रोड या परिसरातही पाणी देता येईल. उर्वरित भागासाठी या टाकीवरून टँकरद्वारे पुरवठा करता येणे शक्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खर्चासाठी १४ व्या वित्त आयोगातून नियोजन करण्याची मागणी केली आहे. यामुळे निळोणा, चापडोह व गोखी अशा तीन प्रकल्पातून टंचाईवर मात करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.