शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:42 IST

शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या.

ठळक मुद्देघेराव : महिनाभरापासून नळाचा पत्ता नाही

पिंपळगावात टँकर चालकाला बदडलेऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या. वडगाव रोड परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तर सिंघानियानगरात महिलांनी ड्रमसह रस्त्यावर ठिय्या दिला. पिंपळगाव येथे तर महिलांचा दुर्गावतार दिसून आला. पाणी वाटपावरून महिलांनी चक्क टँकर चालकालाच बदडले.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील निरोहीनगर, सारंग सोसायटी, प्रगती सोसायटी, वृंदावननगर, धनलक्ष्मीनगर परिसरात महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी दुपारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या. तेथे कार्यकारी अभियंता अजय बेले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेल्याचे समजले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिला निघाल्या असता जीवन प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावरच बेले दिसताच घेराव घातला. तब्बल तासभर हा घेराव सुरू होता.दरम्यान पिंपळगाव परिसरात पाणी वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या ठिकाणी पाणी वितरणासाठी आलेल्या टँकर चालकाला चांगलेच बदडले. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. तर सिंघानियानगरात महिला पाण्याचे रिकामे ड्रम घेऊन रस्त्यावर ठिय्या देऊन टँकरची प्रतीक्षा करीत होत्या.नगराध्यक्षांंनी केली गोखी प्रकल्पाच्या पाण्याची मागणीयवतमाळातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी लोहारा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाºया गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. टंचाई उग्ररुप धारण केले असून तातडीची उपाययोजना म्हणून लोहारा एमआयडीसीतून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत गोखीचे पाणी आणण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या प्रकल्पातून दर्डानगर टाकीद्वारे पाणी आणले जात होते. पुन्हा ही पाईपलाईन कार्यान्वित करून एक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच वडगाव, लोहारा, वाघापूर, दर्डानगर, दारव्हा रोड या परिसरातही पाणी देता येईल. उर्वरित भागासाठी या टाकीवरून टँकरद्वारे पुरवठा करता येणे शक्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खर्चासाठी १४ व्या वित्त आयोगातून नियोजन करण्याची मागणी केली आहे. यामुळे निळोणा, चापडोह व गोखी अशा तीन प्रकल्पातून टंचाईवर मात करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.