शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:42 IST

शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या.

ठळक मुद्देघेराव : महिनाभरापासून नळाचा पत्ता नाही

पिंपळगावात टँकर चालकाला बदडलेऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या. वडगाव रोड परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तर सिंघानियानगरात महिलांनी ड्रमसह रस्त्यावर ठिय्या दिला. पिंपळगाव येथे तर महिलांचा दुर्गावतार दिसून आला. पाणी वाटपावरून महिलांनी चक्क टँकर चालकालाच बदडले.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील निरोहीनगर, सारंग सोसायटी, प्रगती सोसायटी, वृंदावननगर, धनलक्ष्मीनगर परिसरात महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी दुपारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या. तेथे कार्यकारी अभियंता अजय बेले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेल्याचे समजले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिला निघाल्या असता जीवन प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावरच बेले दिसताच घेराव घातला. तब्बल तासभर हा घेराव सुरू होता.दरम्यान पिंपळगाव परिसरात पाणी वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या ठिकाणी पाणी वितरणासाठी आलेल्या टँकर चालकाला चांगलेच बदडले. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. तर सिंघानियानगरात महिला पाण्याचे रिकामे ड्रम घेऊन रस्त्यावर ठिय्या देऊन टँकरची प्रतीक्षा करीत होत्या.नगराध्यक्षांंनी केली गोखी प्रकल्पाच्या पाण्याची मागणीयवतमाळातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी लोहारा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाºया गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. टंचाई उग्ररुप धारण केले असून तातडीची उपाययोजना म्हणून लोहारा एमआयडीसीतून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत गोखीचे पाणी आणण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या प्रकल्पातून दर्डानगर टाकीद्वारे पाणी आणले जात होते. पुन्हा ही पाईपलाईन कार्यान्वित करून एक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच वडगाव, लोहारा, वाघापूर, दर्डानगर, दारव्हा रोड या परिसरातही पाणी देता येईल. उर्वरित भागासाठी या टाकीवरून टँकरद्वारे पुरवठा करता येणे शक्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खर्चासाठी १४ व्या वित्त आयोगातून नियोजन करण्याची मागणी केली आहे. यामुळे निळोणा, चापडोह व गोखी अशा तीन प्रकल्पातून टंचाईवर मात करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.