शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

निर्माल्य विसर्जित करताना दोन चिमुकल्यांसह महिलेचा बुडून मृत्यू

By विलास गावंडे | Updated: April 13, 2024 20:25 IST

यवतमाळ जिल्ह्यातील कवठाबाजारची घटना : सख्ख्या बहिणी अन् काकूचा मृतदेहच निघाला बाहेर

आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील कवठाबाजार येथे एका कुटुंबातील महिला निर्माल्य वाहण्यासाठी गावातील पैनगंगा नदीकाठावर पाेहाेचल्या. येथे निर्माल्य विसर्जित करताना एका चिमुकलीचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिची बहीण व काकू सुद्धा पाण्यात काेसळली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. तिघींचेही मृतदेह हाती लागले.

प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३५), अक्षरा निलेश चौधरी (११), आराध्या निलेश चौधरी (८) अशी मृतांची नावे आहेत. या तिघी घरातील पूजेतून आलेले निर्माल्य विसर्जित करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात गेल्या. तिथे निर्माल्य विसर्जित करत असताना आराध्याचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण अक्षरा व काकू प्रतीक्षा पुढे सरसावल्या, मात्र त्यांचाही घात झाला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. नदीपात्रात रेती उत्खनन केल्यामुळे माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. यातच तिघीही बुडाल्या. ही बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली. ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ताेपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या हाेत्या. अखेर तिघींचेही मृतदेहच हाती लागले. या घटनेने गावात शाेककळा पसरली आहे.रेती माफियामुळे नदी उठली जीवावर

पैनगंगा नदी पात्रातून दिवसरात्र रेतीचा उपसा केला जाताे. त्यासाठी रेती माफियांकडून ट्रेझर बाेट, जेसीबी, पाेकलँड मशिनरीचा वापर केला जाताे. यामुळे नदीपात्रात अक्षरश: विहिरीच्या आकाराचे विवर तयार झाले आहेत. यात पाण्याचा प्रवाह फिरत असल्याने तेथे अंदाज येत नाही. यातूनच शनिवारीची भीषण घटना घडल्याचे कवठाबाजार ग्रामस्थांनी सांगितले. तिघींचा मृत्यू झाल्याने रेती तस्कर व स्थानिक प्रशासनाविराेधात गावकऱ्यांनी आपला राेष व्यक्त केला.