शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाणीटंचाईने घेतला माळेगावात महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ...

ठळक मुद्देप्रशासनाचा निष्काळजीपणा : आर्थिक मदतीसाठी ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे माळेगाव येथे विहीरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. ग्रामस्थांनी महिलेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दुर्लक्ष करणाºया अधिकाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.विमल साहेबराव राठोड (४०) या महिलेचा सोमवारी ४५ फूट विहिरीत पडून मृत्यु झाला. गावात पाणी नसल्याने महिलांना पायपीट करावी लागते. या घटनेमुळे ग्रामस्थ प्रशासनावर भडकले आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह माळेगाव येथील बसस्थानकासमोर ठेवला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विमल राठोड यांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी वृत्त लिहीपर्यंत झाली नव्हती.पाणी टंचाईवर मात करण्याचे कारण पुढे करून प्रशासनाने सहा विहीरींचे अधिग्रहण केले. अधिग्रहण केलेल्या विहिरी कोरड्या आहे. आर्थिक हितसंंबंधातून स्थानिक अधिकारी चुकीचे नियोजन करतात. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो. माळेगाव येथेही हाच प्रकार घडला. ग्रामस्थांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार पाणी टंचाई उपाययोजनेसाठी निवेदने दिली. त्यानंतरही कागदोपत्री विहीर अधिग्रहण दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.माळेगाव येथे चार विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पुसद उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्यापही अंत्यविधी झाला नाही.- एस.बी. मनवर, प्रभारी गटविकास अधिकारी.माळेगाव येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव अद्यापही तहसील कार्यालयाकडे आलेला नाही. आतापर्यंत तालुक्यात २५ विहीरींचे प्रस्ताव आले आहे. आता नवीन प्रस्तावात माळेगावचा समावेश करण्यात आलेला नाही.- नीलेश मडके, तहसीलदार, महागावपंचायत समितीचे काम ढेपाळले आहे. अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. सभापती प्रभारी गटविकास अधिकारी जनतेच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. यामुळे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहे.- संजय राठोड, उपसभापती, महागाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई