शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात २८ हजार रबीचे क्षेत्र उद्ध्वस्त

By admin | Updated: March 4, 2015 01:48 IST

वादळी पावसाने जिल्ह्यात तीन दिवसात २८ हजार ४२७ हेक्टरील रबी पिकांचे नुकसान झाले.

यवतमाळ : वादळी पावसाने जिल्ह्यात तीन दिवसात २८ हजार ४२७ हेक्टरील रबी पिकांचे नुकसान झाले. या सोबतच कापसालाही मोठा फटका बसला असून सततच्या पावसाने कापसातील सरकी अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. तर हवामानाच्या बदलाने पणन महासंघाने कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गहू आणि हरभरा काढणीला आला होता. मात्र निसर्गाच्या अवकृपेच फटका या पिकांना सोबतच संत्रा, केळी, पपई, भाजीपाला पिकांना बसला. तीन दिवस बरसलेल्या पावसाने गहू मातीमोल झाला. सर्वत्र शेतात गहू झोपल्याचे दिसत आहे. ४३३ गावातील पिकांना वादळाचा जबर फटका बसला आहे. दोन दिवसात सरासरी ४८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. अनेक शेतात उशिरा पेरणी झालेला पऱ्हाटी आहे. पऱ्हाटीला मोठ्या प्रमाणात कापूस लागला आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने हा कापूस शेतातच होता. त्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ओल्या झालेल्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटत आहे. तर दुसरीकडे पणन महासंघाने ढगाळी वातावरण लक्षात घेता कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठा अडणीत सापडला आहे. (शहर वार्ताहर)