शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

हिवाळ्यातही पालेभाज्यांचे भाव कडाडलेलेच

By admin | Updated: December 21, 2015 02:36 IST

हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला ....

परजिल्ह्यातून आवक : गतवर्षी कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घटविले क्षेत्र यवतमाळ : हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला तरी भाज्याचे दर मात्र उन्हाळ्यासारखेच आहे. गतवर्षी कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या भाजीबाजारातील दर सर्वसामान्यांचे डोळे विस्फारणारे आहेत. गतवर्षी पाच रुपये किलो विकल्या गेलेले वांगे यावर्षी २०-३० रुपये किलो दराने विकले जात आहे. वाल सुमारे ४० रुपये किलो, काकडी, भेंंडी, कारले ६० रुपये किलो तर फुलगोबी, टमाटे ३० रुपये किलो, शिमला मिर्ची, लवकी, गव्हार ६० रुपयाच्या घरात आहे. इतरही भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येतात. सर्वाधिक दर वाढले आहेत ते भाजीच्या फोडणीतील लसणाचे. सध्या बाजारात १६० ते २०० रुपये किलो दराने लसून विकला जात आहे. हिवाळ्यात दर कडाडण्यामागचे कारण म्हणजे गतवर्षी शेतकऱ्यांना बसलेला मोठा फटका होय. वांगे, टोमॅटो, पालक, सांभार, मेथी आदी भाज्यांची तोडाई मजुरीलाही परवड नसल्याने त्यावेळी शेतकऱ्यांनी बैलाला चारा म्हणून टाकली होती. त्यामुळे यावर्षीही अशीच स्थिती राहील म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीच्या क्षेत्रात घट केली. त्यामुळे भाजीपाला बाजारात कमी प्रमाणात येऊ लागला. परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हिवाळ्यातही भाज्या विकत घेताना ग्राहकांना विचार करावा लागतो. (शहर वार्ताहर) आत्माचे भाजी विक्री केंद्र गेले कुठे ?ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट विक्री व्यवहार करण्यासाठी आत्मांतर्गत यवतमाळच्या गार्डन रोडवर भाजी विक्री केंद्रासाठी गतवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी शेतकरी गटातील शेतकरी भाजी विकणार होते. प्रारंभी महिनाभर केंद्र चालविण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्यानंतर या केंद्रावर कुणी दिसलेच नाही. आता तर केंद्र कुठे गेले असा प्रश्न आहे. यवतमाळच्या बाजारात सकाळी भाज्यांचा लिलाव होतो. त्या ठिकाणचे दर आणि प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आलेल्या दरात तफावत असते. यात व्यापाऱ्यांचा फायदा होतो.