शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातही पालेभाज्यांचे भाव कडाडलेलेच

By admin | Updated: December 21, 2015 02:36 IST

हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला ....

परजिल्ह्यातून आवक : गतवर्षी कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घटविले क्षेत्र यवतमाळ : हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला तरी भाज्याचे दर मात्र उन्हाळ्यासारखेच आहे. गतवर्षी कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या भाजीबाजारातील दर सर्वसामान्यांचे डोळे विस्फारणारे आहेत. गतवर्षी पाच रुपये किलो विकल्या गेलेले वांगे यावर्षी २०-३० रुपये किलो दराने विकले जात आहे. वाल सुमारे ४० रुपये किलो, काकडी, भेंंडी, कारले ६० रुपये किलो तर फुलगोबी, टमाटे ३० रुपये किलो, शिमला मिर्ची, लवकी, गव्हार ६० रुपयाच्या घरात आहे. इतरही भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येतात. सर्वाधिक दर वाढले आहेत ते भाजीच्या फोडणीतील लसणाचे. सध्या बाजारात १६० ते २०० रुपये किलो दराने लसून विकला जात आहे. हिवाळ्यात दर कडाडण्यामागचे कारण म्हणजे गतवर्षी शेतकऱ्यांना बसलेला मोठा फटका होय. वांगे, टोमॅटो, पालक, सांभार, मेथी आदी भाज्यांची तोडाई मजुरीलाही परवड नसल्याने त्यावेळी शेतकऱ्यांनी बैलाला चारा म्हणून टाकली होती. त्यामुळे यावर्षीही अशीच स्थिती राहील म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीच्या क्षेत्रात घट केली. त्यामुळे भाजीपाला बाजारात कमी प्रमाणात येऊ लागला. परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्यामुळे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हिवाळ्यातही भाज्या विकत घेताना ग्राहकांना विचार करावा लागतो. (शहर वार्ताहर) आत्माचे भाजी विक्री केंद्र गेले कुठे ?ग्राहक आणि शेतकरी यांच्यात थेट विक्री व्यवहार करण्यासाठी आत्मांतर्गत यवतमाळच्या गार्डन रोडवर भाजी विक्री केंद्रासाठी गतवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी शेतकरी गटातील शेतकरी भाजी विकणार होते. प्रारंभी महिनाभर केंद्र चालविण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्यानंतर या केंद्रावर कुणी दिसलेच नाही. आता तर केंद्र कुठे गेले असा प्रश्न आहे. यवतमाळच्या बाजारात सकाळी भाज्यांचा लिलाव होतो. त्या ठिकाणचे दर आणि प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आलेल्या दरात तफावत असते. यात व्यापाऱ्यांचा फायदा होतो.