शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वादळी पावसाचा पाच तालुक्यांना फटका

By admin | Updated: May 13, 2017 00:31 IST

गुरूवारी झालेल्या वादळी पावसाने पाच तालुक्यांना जबर फटका बसला. यामध्ये पिकांचे लाखोंचे नुकसान झाले.

केळी, ज्वारी, तिळाचे नुकसान : तीन जखमी, चार जनावरे दगावली, अनेक ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडाली लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गुरूवारी झालेल्या वादळी पावसाने पाच तालुक्यांना जबर फटका बसला. यामध्ये पिकांचे लाखोंचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली. तीन इसम जखमी झाले तर चार जनावरे दगावली. गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, कळंब, घाटंजी आणि नेर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये केळी, आंबा, तिळ आणि ज्वारी पिकाला मोठा फटका बसला. गावरान आंबा गळून पडला. केळीला जबर फटका बसला. पावसासह वादळाने तिळ पूर्णत: झोपला. तर काढणीला आलेली उन्हाळी ज्वारी पूर्णत: काळी पडली. यामुळे उन्हाळी पिकांना लाखोंचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुका स्तरावर सुरू आहे. वादळाने घरावरील टिन उडाली. झोपड्यांचे छत हिरावले गेले. यवतमाळ तालुक्यातील तिवसा गावामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. राजीव गांधी विद्यालयावरील टिन उडाले. या ठिकाणच्या फर्नीचरचे नुकसान झाले. अंतर्गत रस्त्यावर झाड उन्मळून पडले. यामुळे तारा तुटल्या. उमरखेड तालुक्यातील टेंभूरदरामध्ये टिन कोसळल्याने कौसल्या मेंढके, जनाबाई जाधव, रामचंद्र राठोड जखमी झाले. ब्राम्हणगाव, घाटाना, सोनखास हेटी आणि घाटंजीत चार जनावरे दगावले. २४ तासांपासून वीजपुरवठा ठप्प गुरूवारी बोरी परिसरात प्रचंड वादळासह पाऊस झाला. गुरूवारपासून या ठिकाणची वीज गुल झाली. ती शुक्रवारीही आली नाही. विशेष म्हणजे, या केंद्रात विजेचे काम करणारे कर्मचारीच नसल्याचे सांगितले जात आहे. दारव्हा तालुक्याला वादळाचा तडाखा दारव्हा : गुरुवारी झालेल्या वादळी पावसाचा तालुक्याला जबर तडाखा बसला. अनेक गावात घरावरील टीनपत्रे उडून गेली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश तहसीलदार प्रकाश राऊत यांनी दिले असून शनिवारपासून या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दहेली, रामगाव, हरू, पिंपरी(खुर्द) या गावांमध्ये भाजीपाल्याचे पीक उद्ध्वस्त झाले. ब्रह्मी, गणेशपूर, भुलाई येथे केळीचे नुकसान झाले. पांढुर्णा, सावंगी(संगम) व वडगाव(गाढवे) येथील टीनपत्रे या वादळात उडून गेली. शनिवारपासून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक संयुक्त सर्वे करणार असल्याची माहिती नायब तहसीलदार विनोद हरणे यांनी दिली. वादळी पावसामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान जिल्ह्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील पोल पडले. वायरवर झाडे कोसळल्याने वायर तुटून अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कृषी पंप आणि पाणीपुरवठाही बाधीत झाला होता. शुक्रवारी सकाळपासून सर्वप्रथम गावातील आणि पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. यवतमाळ ग्रामीण, कोळंबी व जोडमोहा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात वायर तुटून नुकसान झाले. इतरही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती आहे. यामध्ये महावितरणची लाखो रुपयांची हानी झाली आहे.