शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार

By admin | Updated: March 6, 2015 02:07 IST

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यवतमाळ : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील तळागाळातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणेसाठी, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांसदंर्भात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवठ्यात बैठक आयोजित करण्यात येईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री राठोड यांनी समाजातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार मागण्यांचे निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. तुषार राठोड, प्राचार्य राजाराम राठोड, राजू नाईक, मिलिंद पवार आदीं यावेळी उपस्थित होते. यावेळी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत मॅट न्यायालयाच्या निर्णयामध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी शासनाकडून नामांकित वकिलाची नेमणूक करावी, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणे, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण करणे-स्वतंत्र मंत्री व सचिव देणे, ३०० लोकवस्ती असलेल्या तांड्या व वस्तींना महसूली गावांचा दर्जा देणे व स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याकरिता संबंधितांमार्फत कार्यवाही करणे व माहिती मागवणे, वनसंरक्षण कायद्याअंतर्गत भटक्या विमुक्तांना वनपट्टे देण्याबाबत शासनाने स्पष्टीकरणात्मक आदेश जारी करावा, विमुक्त व भटक्या जमातीची लोक कसत असलेल्या व राहत असलेल्या जमिनींची मालकी हक्क देणेबाबत, भटक्यांचे गायरान चराईचे हक्क सुरक्षित करणे, यवतमाळ येथे विमुक्त भटक्या जमाती संशोधन संस्थेची स्थापना करणे, भूमिहिन शेतमजूरांसाठी वसंतराव नाईक स्वावलंबन योजना सुरू करणे, रमाई आवास योजनेप्रमाणे या समाजातील नागरिकांना ह्लसामकी माता आवास योजनांसह जाहीर करणे, विमुक्त भटक्या जमातीच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या जामतीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील १४५९ पदांच्या आकृतीबंधाला मंजूरी देणे, स्कॉलरशिप करिता आर्थिक तरतूद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ औरंगाबाद येथे वसंतराव नाईक संशोधन केंद्र सुरू करणे, विमुक्त जाती व भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रशासनात आयएएस व आयपीएस होण्यासाठी स्पर्धा परीक्षा, अभ्यासासाठी होस्टेल, रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना जिल्हास्तरावर करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)