शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार

By admin | Updated: March 6, 2015 02:07 IST

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यवतमाळ : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील तळागाळातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणेसाठी, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागण्यांसदंर्भात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवठ्यात बैठक आयोजित करण्यात येईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री राठोड यांनी समाजातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार मागण्यांचे निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. तुषार राठोड, प्राचार्य राजाराम राठोड, राजू नाईक, मिलिंद पवार आदीं यावेळी उपस्थित होते. यावेळी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत मॅट न्यायालयाच्या निर्णयामध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी शासनाकडून नामांकित वकिलाची नेमणूक करावी, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणे, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण करणे-स्वतंत्र मंत्री व सचिव देणे, ३०० लोकवस्ती असलेल्या तांड्या व वस्तींना महसूली गावांचा दर्जा देणे व स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याकरिता संबंधितांमार्फत कार्यवाही करणे व माहिती मागवणे, वनसंरक्षण कायद्याअंतर्गत भटक्या विमुक्तांना वनपट्टे देण्याबाबत शासनाने स्पष्टीकरणात्मक आदेश जारी करावा, विमुक्त व भटक्या जमातीची लोक कसत असलेल्या व राहत असलेल्या जमिनींची मालकी हक्क देणेबाबत, भटक्यांचे गायरान चराईचे हक्क सुरक्षित करणे, यवतमाळ येथे विमुक्त भटक्या जमाती संशोधन संस्थेची स्थापना करणे, भूमिहिन शेतमजूरांसाठी वसंतराव नाईक स्वावलंबन योजना सुरू करणे, रमाई आवास योजनेप्रमाणे या समाजातील नागरिकांना ह्लसामकी माता आवास योजनांसह जाहीर करणे, विमुक्त भटक्या जमातीच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या जामतीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील १४५९ पदांच्या आकृतीबंधाला मंजूरी देणे, स्कॉलरशिप करिता आर्थिक तरतूद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ औरंगाबाद येथे वसंतराव नाईक संशोधन केंद्र सुरू करणे, विमुक्त जाती व भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रशासनात आयएएस व आयपीएस होण्यासाठी स्पर्धा परीक्षा, अभ्यासासाठी होस्टेल, रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना जिल्हास्तरावर करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)