शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

By admin | Updated: August 31, 2015 02:12 IST

आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे.

विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन यवतमाळ : आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक जाती शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. ते आदिवसींचे आरक्षण मागत आहे. मात्र आदिवासींच्या ४५ जातींमध्ये कुठल्याही नवीन जातीला शिरु देणार नाही. मी असे पर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी येथे केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, पुसद तसेच आदिवासी विद्यार्थी संघ, आयनेट बहुद्देशीय संस्था, इंडिजीनस स्टुडंट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील पोस्टल मैदानावर आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन धारणीचे आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त संभाजी सरकुंडे, आदिवासी अपर आयुक्त अशोक आत्राम, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान, बी.जी. डाखोरे, डॉ. अरविंद कुडमेथे, संतोष पेंदाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, उद्धव येरमे, बाबाराव मडावी, सुरेश चिंचोळकर, किरण कुमरे, विठोबा मसराम आदी उपस्थित होते. ना. सावरा म्हणाले, आदिवासी बांधवांमध्ये ऐक्य दिसत नाही. त्यामुळेच अनेक समाज आदिवासी समाजामध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या ४५ जाती एकत्र आल्यातर कुणाचीही आदिवासींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. आपसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाची अधिक संख्या असलेल्या गावांना आपल्या गावाचा विकास करता यावा यासाठी पेसा कायद्यांतर्गत अशा गावांना निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (शहर वार्ताहर) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनीआदिवासी विद्यार्थी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी विद्यार्थी काटक, कणखर आहे. त्यांना चांगले प्रशिक्षण दिल्यास खेळात ते चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येणार असल्याचे ना. सावरा यांनी सांगितले. शिक्षण विभाग खेळात नाविन्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देते. याच धर्तीवर आदिवासी विभागाच्या शाळेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी घोषणाबाजी आदिवासी विकास मंत्र्यांनी आपले प्रश्न सोडवावे म्हणून कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच काही विद्यार्थी घोषणाबाजी करीत होते. यातील काही विद्यार्थी तर स्टेजवरही पोहोचले. त्यांनी शिष्यवृत्ती आणि वसतिगृहाच्या निर्मितीचा प्रश्न मंत्र्यांपुढे मांडला. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.