शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; चार हजार जागांवर विद्यार्थ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शंभर जागा घटल्या : दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यंदा जिल्ह्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याच्या पूर्वीच सुरू झाली आहे. मात्र अद्याप या प्रक्रियेला म्हणावी तेवढी गती आलेली नाही. जिल्ह्यात १६ शासकीय, दोन आश्रमशाळा आणि तीन खासगी अशा  २१ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये एकूण चार हजार १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. दहावीच्या गुणपत्रिका अद्याप न मिळाल्याने आयटीआयला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र लवकरच अर्ज वाढण्याची शक्यता आहे. 

दहावीच्या ‘भरघोस’ निकालाचा घोळ 

- दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा हा मानसिक घोळ अकरावी प्रवेशाच्या सीईटीनंतर मिटणार असून त्यानंतरच आयटीआय प्रवेशासाठी अर्ज वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

सर्वांनाच हवा ‘वायरमन’

मागील वर्षीप्रमाणे यंदाही वायरमन व इलेक्ट्रीशियन या दोन ट्रेडसाठी अर्ज येत आहे. इतर ट्रेडसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असला तरी दोन ट्रेडवर अधिक भर आहे. राज्यात आयटीआयच्या १ लाख ३६ हजार जागांसाठी ४७ हजार ९४८ अर्ज आले. केंद्रीय पद्धतीची असल्याने जिल्ह्यातील अर्जांचा आकडा सध्या अस्पष्ट आहे. 

 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण