शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाणवठे आटल्याने वन्यजीव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:10 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे.

ठळक मुद्देशिकारी वाढल्या : वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्यांचे व्यवस्थापन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे. असे असले तरी वनविभाग मात्र याविषयात अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये, यासाठी वनविभागाच्यावतीने वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील जंगलामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी या पाणवठ्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या पाणवठ्यांमध्ये नियमीत पाण्याची व्यवस्था केली जाते की नाही, हादेखिल संशोधनाचा विषय ठरला आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यांमध्ये वन्यजीवांची संख्या मोठी आहे. त्यात वाघ, हरिण, मोर, ससे, रोही, रानडुकरे, निलगाय, यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजीवांच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्त्यांकडे धाव घेतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते. हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही उपायययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते. परिणामी गेल्या काही वर्षात झरी व वणी तालुक्यात व्याघ्र हल्ल्यामध्ये अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत. पांढरकवडा वनपरीक्षेत्रात जवळपास २६ वाघ आहेत. त्यातील अनेक वाघ झरी परिसरातील जंगलांमध्ये भटकत असतात.शिकार व पाण्याच्या शोधात अनेकदा हे वाघ लोकवस्त्यांपर्यंत पोहोचतात. त्यातून व्याघ्र हल्ले झाल्याचा इतिहास आहे. जंगलात असलेल्या पाणवठ्यांची व्यवस्थित देखभाल झाल्यास मानव-वन्यजीव संघर्षाला पूर्णविराम मिळू शकतो. परंतु पाणवठ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घोन्सा ते झरी मार्गावर अनेकदा वन्यजीवांचे दर्शन होते. या भागात मोरांची संख्या मोठी आहे. एकावेळी ४०-४० मोरांचा थव्वा वर्दळीच्या रस्त्यावर पाण्याच्या शोधात भटकताना अनेकदा नजरेस पडला आहे.मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळाझरी तालुक्यातील जंगलांमध्ये मोर व सशांची संख्या मोठी आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्यांच्या मांसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने त्यांची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदाच या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्यांची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीटंचाई