शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:38 IST

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनेर वनपरिक्षेत्र : सोनखास, मालखेड राखीव वनातील समस्या

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या राखीव जंगलामध्ये बिबटाचाही संचार असल्याची नोंद आहे. आता पाणी नसल्याने बिबट गावशिवारातील पाणवठ्यांवर येत आहे. हरीण, रोही, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे हे प्राणीसुद्धा पाणवठ्यावर येत आहे. तृणभक्षी प्राण्यांची दबा धरून शिकार केली जात आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून जंगलात पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून वन विभागाचा हा उपक्रम ठप्प आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नाही. तहानेने व्याकूळ झालेले प्राणी गलितगात्र अवस्थेत गावशिवारात भरकटताना दिसत आहे. येथे कुत्र्यांकडून हरीण, रानडुक्कर, रोही याची शिकार होत आहे. सोनखास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई असून या बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जंगलातील पाणवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद केली जाते. वार्षिक बजेट असल्यानंतरही स्थानिक वन अधिकारी व सहायक उपवनसंरक्षकाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष आहे. याच तालुक्यातील लोनाडी बीटमध्ये बिबटाने हल्ला करून वगाराची शिकारही केली होती. सातत्याने बिबटाकडून गावशिवारात शिकारी होत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात नाही. हा बिबट ट्रॅप कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. आता तर तापमानात वाढ झाली असून पाणवठा शोधण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, बिबट यासारख्या हिंस्त्र श्वापदापासून शेत शिवारात काम करणाºया मजुरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे तर काहींनी जंगलातील पाणीटंचाईचा उपयोग शिकारीसाठी केला आहे. गावालगतच्या पाणवठ्यावर शिकारी दबा धरून बसतात. सावज टप्प्यात येताच त्याची शिकार केल्या जाते. रोही, हरीण याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असून मांसाची विक्री सुरू आहे. एकीकडे वनसंवर्धनासाठी शासकीयस्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.स्थानिक अधिकारी व यंत्रणा मात्र अर्थकारणाच व्यस्त असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.वन विभागाचा टँकर जंगलात येत नाहीजंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरची तरतूद केली आहे. यावर आर्थिक खर्च झाल्याचे नियमित दाखविले जाते. प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्यांची स्थिती भयावह आहे. वन्यप्राणी याच वेळखाऊ धोरणामुळे धोक्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम नियमित होत नाही. याचा फटका परिसरातील नागरिकांसह वन्यप्राण्यांना बसत आहे. वरिष्ठांनी राखीव जंगलातील पाणवठ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याची गरज आहे.