शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

जंगलातील पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:38 IST

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनेर वनपरिक्षेत्र : सोनखास, मालखेड राखीव वनातील समस्या

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या राखीव जंगलामध्ये बिबटाचाही संचार असल्याची नोंद आहे. आता पाणी नसल्याने बिबट गावशिवारातील पाणवठ्यांवर येत आहे. हरीण, रोही, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे हे प्राणीसुद्धा पाणवठ्यावर येत आहे. तृणभक्षी प्राण्यांची दबा धरून शिकार केली जात आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून जंगलात पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून वन विभागाचा हा उपक्रम ठप्प आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नाही. तहानेने व्याकूळ झालेले प्राणी गलितगात्र अवस्थेत गावशिवारात भरकटताना दिसत आहे. येथे कुत्र्यांकडून हरीण, रानडुक्कर, रोही याची शिकार होत आहे. सोनखास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई असून या बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जंगलातील पाणवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद केली जाते. वार्षिक बजेट असल्यानंतरही स्थानिक वन अधिकारी व सहायक उपवनसंरक्षकाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष आहे. याच तालुक्यातील लोनाडी बीटमध्ये बिबटाने हल्ला करून वगाराची शिकारही केली होती. सातत्याने बिबटाकडून गावशिवारात शिकारी होत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात नाही. हा बिबट ट्रॅप कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. आता तर तापमानात वाढ झाली असून पाणवठा शोधण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, बिबट यासारख्या हिंस्त्र श्वापदापासून शेत शिवारात काम करणाºया मजुरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे तर काहींनी जंगलातील पाणीटंचाईचा उपयोग शिकारीसाठी केला आहे. गावालगतच्या पाणवठ्यावर शिकारी दबा धरून बसतात. सावज टप्प्यात येताच त्याची शिकार केल्या जाते. रोही, हरीण याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असून मांसाची विक्री सुरू आहे. एकीकडे वनसंवर्धनासाठी शासकीयस्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.स्थानिक अधिकारी व यंत्रणा मात्र अर्थकारणाच व्यस्त असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.वन विभागाचा टँकर जंगलात येत नाहीजंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरची तरतूद केली आहे. यावर आर्थिक खर्च झाल्याचे नियमित दाखविले जाते. प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्यांची स्थिती भयावह आहे. वन्यप्राणी याच वेळखाऊ धोरणामुळे धोक्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम नियमित होत नाही. याचा फटका परिसरातील नागरिकांसह वन्यप्राण्यांना बसत आहे. वरिष्ठांनी राखीव जंगलातील पाणवठ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याची गरज आहे.