शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

युनियन बँकेला का झाला असेल दंड, खातेदाराची तक्रार; जिल्हा ग्राहक आयोगाची चपराक

By विलास गावंडे | Updated: August 20, 2023 14:02 IST

खातेदाराने वारंवार मागणी केली. बँकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली.

यवतमाळ : खातेदाराने वारंवार मागणी केली. बँकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. निकाल ग्राहकाच्या बाजूने लागला. बँकेला दंड ठोठावण्यात आला.  नेर येथील राम माधवराव हळदे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा निकाल देण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांनी वकिलाकडे न देता आयाेगापुढे स्वत: आपली बाजू मांडली.

राम हळदे यांचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेर येथील शाखेत खाते आहे. पासबूक गहाळ झाल्याने त्यांनी बँकेकडे नवीन पासबुकाची मागणी केली. यासाठी प्रत्यक्ष आणि पोस्टाद्वारे अर्ज करूनही त्यांना तातडीने नवीन पासबूक दिले नाही. या प्रकारात त्रास होत असल्याने त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. युनियन बँक ऑफ इंडिया मुख्य व्यवस्थापक मुंबई आणि नेर शाखा व्यवस्थापक यांना गैरअर्जदार करण्यात आले.

यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य ॲड.हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये बँकेने हळदे यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. अर्ज केल्यानंतर तब्बल १६ दिवसांनी पासबुकची दुय्यम प्रत देण्यात आली. या सर्व प्रकारात हळदे यांना मनस्ताप झाला, अडचणींना तोंड द्यावे लागले, असे नमूद करत आयोगाने बँकेला दंड ठोकला आहे. 

शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक हजार आणि तक्रारीच्या खर्चाचे एक हजार रुपये बँकेने तक्रारदाराला द्यावे, असा आदेश देण्यात आला. बँकेचे मुख्य व्यवस्थापक आणि नेर शाखा व्यवस्थापकांनी वैयक्तिकरित्या संयुक्तपणे ही रक्कम द्यायची आहे. या निर्णयामुळे बँकेला चपराक बसली आहे.