शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

पांढरकवड्याची काटकसर इतरांना का जमली नाही ?

By admin | Updated: May 14, 2016 02:22 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा विभागाने काटकसर करून अवघ्या सात लाखांच्या खर्चात वर्ष भागविले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील उधळपट्टी : केवळ सात लाखांत वर्ष भागविलेयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा विभागाने काटकसर करून अवघ्या सात लाखांच्या खर्चात वर्ष भागविले. या उलट अन्य विभागांनी खर्चाचा हा आकडा १२ ते १६ लाखांवर नेला. पांढरकवडा विभागाला जमलेली काटकसर अन्य विभागाला का करता आली नाही, असा प्रश्न या निमित्ताने सहकार क्षेत्रात उपस्थित केला जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात चहापान, वाहन व भत्त्यांवर तब्बल तीन कोटी ७२ लाख २० हजार रुपयांचा खर्च केला. त्यात यवतमाळ मुख्य कार्यालय आणि पाच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक १६ लाखांचा खर्च वणीचा तर सर्वात कमी सात लाखांचा पांढरकवडा विभागाचा आहे. पांढरकवडा विभाग अवघ्या सात लाखांत वर्षभराचा खर्च भागवू शकते तर अन्य विभागांना ते का शक्य झाले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. काटकसरीतूनही शेतकऱ्यांचा सन्मान - अ‍ॅड. प्रफुल्ल मानकरपांढरकवडा विभागाने खर्चाच्या काटकसरीचा नेमका कोणता पॅटर्न राबविला याबाबत जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा पांढरकवडा विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अनेक बाबी सांगितल्या. अ‍ॅड. मानकर म्हणाले, मी सहसा राळेगावच्या बँक शाखेत जात नाही, गेलो तरी कामकाजाच्या चौकशीच्या अनुषंगानेच जातो. पांढरकवडा विभागीय कार्यालयात जाताना घरुन जेवणाचा डबा घेऊन जातो. बँकेऐवजी स्वत:चे वाहन, चालक वापरतो. माझेच अनुकरण अन्य संचालकही करतात. कधी बँक शाखेचा खर्च अतिरिक्त वाटल्यास लगेच संबंधित व्यवस्थापकाला जाब विचारला जातो. आवश्यकता असेल तेथेच खर्च केला जातो. आमचा विभाग लहान असल्याने तसाही खर्च कमीच होतो. संचालकांपासून व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच काटकसरीचे धोरण अवलंबिल्याने अवघ्या सात लाखात वर्षभराचा खर्च भागविता आला. हा खर्च आणखीही कमी करता येतो का या दिशेने प्रयत्न केले जाणार आहे. बँकेचे कर्जदार व ठेवीदार असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र पांढरकवडा विभागीय शाखेत चहापान करून योग्य तो सन्मान राखला जात असल्याचे मानकर यांनी सांगितले. असाच सन्मान सर्व शाखेत ठेवण्याबाबत आपण प्रस्ताव दिला होता. मात्र सध्या तरी त्याची अंमलबजावणी केवळ पांढरकवडा विभागातच नियमित सुरू असल्याचे प्रफुल्ल मानकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी व्यवस्थापकांना धारेवर धरले ‘दुष्काळातही शेतकऱ्यांच्या बँकेत उधळपट्टी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताचा परिणाम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवसभर जाणवला. तुमच्याकडे वारेमाप खर्चासाठी पैसा आहे, तुम्ही उधळपट्टी करता, मौजमजा करता आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही अशा शब्दात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाईक असलेल्या ठेकेदारांनी व्यवस्थापनाला सुनावल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेचा वर्षभरातील चहापान, वाहन, भत्त्यांवरील पावणे चार कोटींच्या खर्चाचा लेखाजोखा ‘लोकमत’ने उघड केल्याने शेतकरी वर्गात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.वणीत संचालकाच्या मुलाची चलती वणी विभागीय कार्यालयात एका संचालकाच्या लिपिकवर्गीय मुलाचीच सर्वाधिक चलती असल्याचे बँकेच्याच यंत्रणेतून सांगितले जाते. बँकेचा बहुतांश कारभार या मुलाच्याच इशाऱ्यावरून चालत असल्याने यंत्रणा त्रस्त असल्याची ओरडही ऐकायला मिळत आहे.