शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महसूलला जमले ते जिल्हा परिषदेला का नाही?

By admin | Updated: January 4, 2015 23:21 IST

वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला मदत करण्यासाठी महसूल विभागाने क्रीडा

यवतमाळ : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला मदत करण्यासाठी महसूल विभागाने क्रीडा स्पर्धा रद्द करून गोळा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता कोषात जमा केला. आता जिल्हा परिषदेतही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू आहे. त्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांकडून वर्गणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही महसूल प्रशासनाप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे आल्यास काय वावगे ठरणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीपातील कापूस, सोयाबीनचे उत्पन्न बुडाले आता अवकाळी पावसाने रबीतील पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याची आणेवारीही केवळ ४४ पैसे इतकीच लागली. त्यामुळे सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शासनही राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीला कसे हाताळावे या विवंचनेत आहे. सर्व घटकांनी अशा स्थितीत स्वत:हून मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गोळा झालेला निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे. हाच कित्ता जिल्हा परिषद प्रशासनानेसुद्धा गिरवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या क्रीडास्पर्धेवर साधारणत: सहा ते सात लाख रुपये खर्च होता. १२ जानेवारीच्या आसपास या स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. एक वर्ष क्रीडास्पर्धा घेण्याऐवजी तो निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाच्या झोळीत टाकल्यास कौतुकास्पद ठरू शकते. या कृतीतून कर्मचारी आणि प्रशासनसुद्धा संवदेनशिलता जोपासत असल्याचे प्रतीत होते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच यासाठी भूमिका घ्यावी जेणेकरून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलणे शक्य होईल. या मदतीने फार फरक पडणार नाही, मात्र दुष्काळी झळांनी होरपळलेल्यांना मानसिक आधार मिळेल. हेच काय ते या मदतीचे फलीत ठरू शकते. परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक आधाराचीच खरी गरज असते. अगदी छोट्या-छोट्या मदतीतून तो मिळत असतो. परिस्थितीला तोंड देणाऱ्यांना धैर्य देण्याचे कामही फार मोलाचे ठरते. सुदैवाने ही संधी जिल्हा परिषद प्रशासनापुढे चालून आली आहे. आपणही संवेदनशिल आहोत हे दाखवून देण्याची हिच खरी वेळ आहे. (कार्यालय प्रतिनिधी)