शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांच्या निकालाला विलंब का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंपन्यांकडून बियाणे आलेच नाही असे सांगितले जात होते. तर काहींना हेच बियाणे जादा दराने विकले गेले. कृषी विभागाने अशा आठ गोदामांची तपासणी केली होती.

ठळक मुद्देठोक सोयाबीन विक्रेते : जादा दराने विक्री, कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगाम काळात यवतमाळातील ठोक बियाणे विक्रेत्यांनी सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दरात विक्री करीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणात या विक्रेत्यांना नोटीस बजावून सुनावणी पूर्ण झाली. मात्र त्यावरील निर्णय देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संबंधित कृषी प्रशासनाकडे साशंकतेने पाहिले जात आहे.सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंपन्यांकडून बियाणे आलेच नाही असे सांगितले जात होते. तर काहींना हेच बियाणे जादा दराने विकले गेले. कृषी विभागाने अशा आठ गोदामांची तपासणी केली होती. तेथे साठेबाजी व काही गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे यवतमाळातील चार ते पाच ठोक विक्रेत्यांना कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने नोटीस बजावली होती. त्यामध्ये दिलीप बोगावार यांचे कृषी प्रगती, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र, राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र आणि ओमप्रकाश गुप्ता यांच्या कृषी कल्पतरू या बियाणे विक्री प्रतिष्ठानांचा समावेश आहे.नियंत्रण पथकाचे अधिकारी ‘संपर्का’बाहेरनोटीसच्या अनुषंगाने विक्रेत्यांना समक्ष बोलावून व त्यांची बाजू ऐकून घेऊन सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी होऊन अनेक दिवस लोटले. मात्र अद्याप त्यावर निर्णय दिला गेलेला नाही. या निर्णयास विलंब का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात कुठे पाणी तर मुरत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. निकालाला विलंब होत असल्याने कृषी प्रशासनाकडे साशंकतेने पाहिले जात आहे. सर्व काही पारदर्शक असेल तर लगेच निकाल व कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठे तडजोड झाली असेल तर ही कारवाई दडपली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :agricultureशेती