शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

महागावातील ३० हजारांवर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण ?

By admin | Updated: March 14, 2015 02:19 IST

खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत.

महागाव : खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत. डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडाणाला तर केंद्रीय दक्षता पथकाने तालुक्याची पाहणी केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दक्षता पथक आणि ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुडाणा येथे येवून गेले. दोनही घटनेतील नेते आणि केंद्रातील दक्षता पथक खूप महत्त्वाचे आहे. या दोनही महत्त्वाच्या व्यक्तींकडून मुडाणा येथे पाहणी करण्यात आली. मात्र मुडाणा येथील शेतकऱ्यांची स्थिती जैसे थेच आहे. तिच स्थिती तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांना आता नुसत्या भेटी नको तर ठोस मदतीची गरज आहे. सतत तीन हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी कसाबसा तग धरून आहे. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मुडाणा येथील शेतकरी गंगाप्रसाद खंदारे यांनी केंद्रीय दक्षता पथकासमोर मांडली होती. तीन एकरात एक क्विंटलही कापूस त्यांना झाला नव्हता. तिच गत तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. कमी पावसाचा फटका खरिपाला बसला. त्यामुळे सर्व भिस्त रबी हंगामावर होती. परंतु पीक काढणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तीन दिवस झोडपून काढले. हरभरा काळा पडला, ओंब्याने लदबदलेला गहू जमिनदोस्त झाला. फळपीक, भाजीपाल्याचे नुकसान झाले. सर्व बाजूने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मदतीची गरज आहे. मात्र अद्याप मदतीची घोषणाच झाली नाही. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव होय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)