शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

महागावातील ३० हजारांवर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण ?

By admin | Updated: March 14, 2015 02:19 IST

खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत.

महागाव : खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत. डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडाणाला तर केंद्रीय दक्षता पथकाने तालुक्याची पाहणी केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दक्षता पथक आणि ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुडाणा येथे येवून गेले. दोनही घटनेतील नेते आणि केंद्रातील दक्षता पथक खूप महत्त्वाचे आहे. या दोनही महत्त्वाच्या व्यक्तींकडून मुडाणा येथे पाहणी करण्यात आली. मात्र मुडाणा येथील शेतकऱ्यांची स्थिती जैसे थेच आहे. तिच स्थिती तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांना आता नुसत्या भेटी नको तर ठोस मदतीची गरज आहे. सतत तीन हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी कसाबसा तग धरून आहे. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मुडाणा येथील शेतकरी गंगाप्रसाद खंदारे यांनी केंद्रीय दक्षता पथकासमोर मांडली होती. तीन एकरात एक क्विंटलही कापूस त्यांना झाला नव्हता. तिच गत तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. कमी पावसाचा फटका खरिपाला बसला. त्यामुळे सर्व भिस्त रबी हंगामावर होती. परंतु पीक काढणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तीन दिवस झोडपून काढले. हरभरा काळा पडला, ओंब्याने लदबदलेला गहू जमिनदोस्त झाला. फळपीक, भाजीपाल्याचे नुकसान झाले. सर्व बाजूने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मदतीची गरज आहे. मात्र अद्याप मदतीची घोषणाच झाली नाही. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव होय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)