शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

महागावातील ३० हजारांवर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण ?

By admin | Updated: March 14, 2015 02:19 IST

खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत.

महागाव : खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत. डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडाणाला तर केंद्रीय दक्षता पथकाने तालुक्याची पाहणी केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दक्षता पथक आणि ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुडाणा येथे येवून गेले. दोनही घटनेतील नेते आणि केंद्रातील दक्षता पथक खूप महत्त्वाचे आहे. या दोनही महत्त्वाच्या व्यक्तींकडून मुडाणा येथे पाहणी करण्यात आली. मात्र मुडाणा येथील शेतकऱ्यांची स्थिती जैसे थेच आहे. तिच स्थिती तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांना आता नुसत्या भेटी नको तर ठोस मदतीची गरज आहे. सतत तीन हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी कसाबसा तग धरून आहे. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मुडाणा येथील शेतकरी गंगाप्रसाद खंदारे यांनी केंद्रीय दक्षता पथकासमोर मांडली होती. तीन एकरात एक क्विंटलही कापूस त्यांना झाला नव्हता. तिच गत तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. कमी पावसाचा फटका खरिपाला बसला. त्यामुळे सर्व भिस्त रबी हंगामावर होती. परंतु पीक काढणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तीन दिवस झोडपून काढले. हरभरा काळा पडला, ओंब्याने लदबदलेला गहू जमिनदोस्त झाला. फळपीक, भाजीपाल्याचे नुकसान झाले. सर्व बाजूने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मदतीची गरज आहे. मात्र अद्याप मदतीची घोषणाच झाली नाही. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव होय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)