शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून ‘कॅबिनेट’पदी बढती कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 20:57 IST

भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्ताराचे वेध : मदन येरावार की संजय राठोड?, लोकसभेतील ‘परफॉर्मन्स’ उपयोगी ठरणार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.युती सरकारची साडेचार वर्ष संपली. परंतु अलिकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या झालेल्या घोषणा केवळ फार्स ठरल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचे फारसे कुणाला अप्रूप राहिलेले नाहीत. कित्येकांनी तर आता या विस्ताराचा नादही सोडला आहे. काहींना हे पद मिळाले तरी नका आहे, तीन महिन्यात काय ‘परफॉर्मन्स’ दाखवायचा असा त्यांचा सवाल आहे. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपकडून मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड राज्यमंत्री आहेत. या दोघांपैकी कुणाला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे कार्यकर्ते येरावारांना तर शिवसैनिक राठोडांना कॅबिनेट पक्के असल्याचे सांगत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्याकडील अन्न व औषधी प्रशासन या खात्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मदन येरावार यांच्याकडे कालपर्यंत सोपविण्यात आली होती. ते पाहता त्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मंत्र्यांना बढती मिळते की केवळ त्यांच्याकडील खात्यांमध्ये फेरबदल केला जातो, हे पाहणेही महत्वाचे ठरते.राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ पाहिला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या भावना गवळी यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार मतांची आघाडी देणारे भाजपचे मदन येरावार ‘प्लस’ ठरतात. शिवसेनेचे संजय राठोड यांनीही आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून भावनातार्इंना मतांची आघाडी मिळवून दिली. परंतु २०१४ च्या तुलनेत ही आघाडी साडेआठ हजाराने कमी झाली आहे. इकडे यवतमाळात ३७ हजारांच्या मतांच्या आघाडीत शिवसेनेचाच वाटा अधिक आहे, भाजप सक्रिय नव्हते असा दावा सेनेच्या गोटातून केला जात आहे. तर तिकडे दिग्रसमध्ये भावनातार्इंना मिळालेल्या मतांच्या आघाडीत भाजपचाही समान वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. अशीच स्थिती उमरखेड मतदार संघात आहे. त्यामुळे कुठे कुणी कुणाचे काम केले हा राजकीय दृष्ट्या संशोधनाचा विषय ठरला आहे.वणीतील ‘परफॉर्मन्स’ अदखलपात्रवणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना लोकसभेत भाजप उमेदवारासाठी केवळ दोन हजार मतांची आघाडी खेचून आणता आल्याने त्यांचा ‘परफॉर्मन्स’ पक्षाच्या नजरेत अदखलपात्र ठरतो आहे. गेल्या वेळी भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या आघाडीत वणीमध्ये ५० हजारांवर मतांनी घट झाली आहे. त्यामुळे आमदार बोदकुरवार यांचा ‘परफॉर्मन्स’ ‘मायनस’मध्ये जात असल्याचे स्पष्ट आहे.उमरखेड, आर्णीचाही परफॉर्मन्स जोरदारकेवळ लोकसभेतील कामगिरीचा विचार केल्यास उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णीचे आमदार राजू तोडसाम हेसुद्धा सरस ठरतात. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला अनुक्रमे ४२ हजार व ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.आदिवासी कोट्यातून अशोक उईकेंची चर्चाराळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. मात्र आदिवासी समाजातील विद्यमान नावात काही फेरबदल करायचे झाले तरच उईकेंचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, असे सांगितले जाते. या लोकसभा निवडणुकीत भावनातार्इंचे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील गतवेळचे सर्व पाठीराखे यावेळी उघडपणे काँग्रेससोबत असतानाही सेनेला २८ हजार मतांची आघाडी मिळाली. यात उईके यांचा मोठा वाटा आहे. लोकसभेतील त्यांची ही कामगिरी मंत्रीपदावरील वर्णीच्या दृष्टीने महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेची नजरयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या. मोदी लाटेने त्यांना यावेळीही तारले. ज्येष्ठ खासदारांमध्ये वरच्या क्रमांकावर असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र यावेळी ‘२० खासदारांमागे एक मंत्रीपद’ असा कोटा भाजपने ठरविल्यामुळे सेनेच्या वाट्याला केवळ एक मंत्रीपद आले आणि तेही मुंबईत स्थिरावले. लगतच्या भविष्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही व संख्याबळामुळे सेनेच्या वाट्याला आणखी मंत्रिपद येण्याची शक्यता कमीच आहे. सेनेने आता लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर दावा ठोकला आहे. या पदावर ज्येष्ठ असलेल्या भावनातार्इंची वर्णी लागते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मला मंत्रीपद नको, मी पक्षातच काम करणार असे भावनाताई सांगत आहेत. मग त्यांची दिल्लीत मंत्रिमंडळ स्थापने दरम्यान अनुपस्थिती व नाराजी कशासाठी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तार्इंना किमान उपाध्यक्षपद तरी द्यावे, अशी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांची भावना आहे.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारSanjay Rathodसंजय राठोड