शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

जिथे अधिक व्हायचे तिथे आता होत आहे सगळेच उणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:53 IST

विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे.

ठळक मुद्देहमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांताकडे मान्सूनने फिरवली पाठ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट मराठवाड्याची चिंता आता विदर्भाच्या वाट्याला

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा प्रांत म्हणून यवतमाळची राज्यात ओळख आहे. अस्मानी संकटाने यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांची ही ओळख पुसून काढली आहे. कमजोर मान्सूनने या जिल्ह्याचा घात केला आहे. मान्सूनमध्ये भरपूर पाऊस असणाऱ्या ठिकाणी आता उणे नोंद झाली आहे.विदर्भात सर्वाधिक पाऊस कोसळतो. त्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. हवामान अभ्यासकांनी या घटनेला ‘विक मान्सून’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

या स्थितीत ढगाचे अल्प प्रमाण असते. वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किमी असतो. हवेत बाष्प नसते. यामुळे काही पॅचमध्ये हा पाऊस पडतो. तर काही ठिकाणी पडत नाही. वाºयाचा वेग ताशी ४० ते ५० असेल आणि बाष्प घेऊन येणारे समुद्राचे वारे असेल तर पाऊस हमखास बरसतो. तशी स्थितीत विदर्भावर निर्माण होण्याची प्रक्रिया गत दोन वर्षात प्रारंभीच्या काळात मंदावली आहे. या ठिकाणावरून मान्सूनचे वारे ‘डिव्हाईड’ होत आहे. इतर ठिकाणी मान्सूनच्या वाऱ्याचा वेग तीव्र आहे.संपूर्ण जून महिना संपला, मात्र पावसाची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. १७ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या उणे ३३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात सरासरीच्या उणे २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. गोंदियाला उणे २४ टक्के पाऊस झाला आहे. वर्धेत ८ टक्के कमी पाऊस आहे. चंद्रपूरमध्ये १२ टक्के कमी, गडचिरोलीत १२ टक्के कमी, तर साताऱ्यात ८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये उणे ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. ठाण्यात २६ टक्के कमी पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला. रायगडमध्ये २२ टक्के कमी पाऊस झाला.आता या कमी पावसाने कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे. पीक नाजूक अवस्थेत आहे. अशा स्थितीत उन्हाचा पारा ३६ अंशापर्यंत वर चढला आहे. तर पीक मान टाकत आहे. यामुळे शेतकरी १७ दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड पडत होता. आता विदर्भ आणि मुंबईच्या क्षेत्रात पावसाचा खंड पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.हवामानाचा पुन्हा अंदाज खरा ठरेल काय?हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ३, ४ आणि ५ जुलैला पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी वर्तविलेला पावसाचा अंदाज फेल ठरला आहे. यामुळे यावेळचा अंदाज नक्की खरा ठरेल काय, यावर साशंकता व्यक्त होत आहे.सहा जिल्ह्यात क्षमतेपेक्षा ६० टक्के अधिक पाऊससहा जिल्ह्यात क्षमतेच्या ६० टक्के अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, अहमदाबाद, बिड, सोलापूर, लातूर या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडला आहे. १२ जिल्ह्यात २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि वाशिममध्ये चांगल्या पावसाची नोंद २ जुलैला हवामान विभागाने केली आहे. ६ जिल्ह्यात जेमतेम पाऊस पडला आहे. यामध्ये अमरावती, नांदेड, नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे.विदर्भाला विक मान्सूनचा फटका बसला आहे. पुढील तीन दिवस चांगला पाऊस वेधशाळेने वर्तविला आहे. कमी पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस