शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे.

ठळक मुद्देधडपड व्यर्थ : टेलपर्यंत सिंचन क्षेत्र वाढविण्यात अडसर

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस-वेणी धरणाचे पाणी टेलपर्यंत नेण्याची पाटबंधारे विभागाची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याकरिता गेल्यावर्षी नऊ कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही पाटबंधारे विभागाला मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी नेण्याची धडपड व्यर्थ होताना दिसत आहे.लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे. लोअरपूसचे पाणी टेलपर्यंत पोहोचल्यास आणखी दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.लोअरपूस-वेणी धरणाची सिंचन क्षमता सहा हजार ६०० हेक्टर असल्याचे सांगितले जाते. मात्र टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच सिंचन होते. यामुळे हा मंजूर निधी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला असता. टेलपर्यंत पाणी नेण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शेतकºयांनी विविध आंदोलने केली होती. मात्र ही समसया अद्याप अधांतरीच आहे. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बैठक घेऊन नऊ कोटी ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. मात्र वर्ष लोटूनही हा निधी मिळाला नाही.कॅनाल, मायनरचे काम रखडलेमंजूर निधीतून कॅनाल आणि मायनरचे काम करण्याची योजना आखण्यात आली होती. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता होती. मात्र मंजूर निधी मिळाला नसल्याने या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचे वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबीलवादे यांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. सध्या लोअरपूसचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नसून रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे सिंचन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प