शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे.

ठळक मुद्देधडपड व्यर्थ : टेलपर्यंत सिंचन क्षेत्र वाढविण्यात अडसर

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस-वेणी धरणाचे पाणी टेलपर्यंत नेण्याची पाटबंधारे विभागाची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याकरिता गेल्यावर्षी नऊ कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही पाटबंधारे विभागाला मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी नेण्याची धडपड व्यर्थ होताना दिसत आहे.लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे. लोअरपूसचे पाणी टेलपर्यंत पोहोचल्यास आणखी दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.लोअरपूस-वेणी धरणाची सिंचन क्षमता सहा हजार ६०० हेक्टर असल्याचे सांगितले जाते. मात्र टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच सिंचन होते. यामुळे हा मंजूर निधी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला असता. टेलपर्यंत पाणी नेण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शेतकºयांनी विविध आंदोलने केली होती. मात्र ही समसया अद्याप अधांतरीच आहे. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बैठक घेऊन नऊ कोटी ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. मात्र वर्ष लोटूनही हा निधी मिळाला नाही.कॅनाल, मायनरचे काम रखडलेमंजूर निधीतून कॅनाल आणि मायनरचे काम करण्याची योजना आखण्यात आली होती. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता होती. मात्र मंजूर निधी मिळाला नसल्याने या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचे वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबीलवादे यांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. सध्या लोअरपूसचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नसून रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे सिंचन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प