शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे.

ठळक मुद्देधडपड व्यर्थ : टेलपर्यंत सिंचन क्षेत्र वाढविण्यात अडसर

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस-वेणी धरणाचे पाणी टेलपर्यंत नेण्याची पाटबंधारे विभागाची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याकरिता गेल्यावर्षी नऊ कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही पाटबंधारे विभागाला मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी नेण्याची धडपड व्यर्थ होताना दिसत आहे.लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे. लोअरपूसचे पाणी टेलपर्यंत पोहोचल्यास आणखी दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.लोअरपूस-वेणी धरणाची सिंचन क्षमता सहा हजार ६०० हेक्टर असल्याचे सांगितले जाते. मात्र टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच सिंचन होते. यामुळे हा मंजूर निधी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला असता. टेलपर्यंत पाणी नेण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शेतकºयांनी विविध आंदोलने केली होती. मात्र ही समसया अद्याप अधांतरीच आहे. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बैठक घेऊन नऊ कोटी ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. मात्र वर्ष लोटूनही हा निधी मिळाला नाही.कॅनाल, मायनरचे काम रखडलेमंजूर निधीतून कॅनाल आणि मायनरचे काम करण्याची योजना आखण्यात आली होती. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता होती. मात्र मंजूर निधी मिळाला नसल्याने या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचे वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबीलवादे यांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. सध्या लोअरपूसचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नसून रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे सिंचन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प