शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:35 IST

सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले.

ठळक मुद्दे४७८ अनाथांचा पिता : सागर रेड्डीच्या धडपडीची झेप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. त्या उत्तराचे नाव आहे, सागर रेड्डी!आंतरजातीय विवाह केलेल्या मायबापांच्या पोटी जन्माला आलेला हा पोरगा. आईबाबाचा खून झाला अन् तो अनाथ झाला. सागर रेड्डीची इथपर्यंतची कहाणी ‘सैराट’सारखीच. पण इथून पुढची कहाणी सिनेमाच्या पडद्यावर मावणारी नाही. हा अनाथ पोरगा आता इंजिनिअर झाला अन् शेकडो अनाथांचा पालक झाला. हा अनाथांचा नाथ सध्या यवतमाळात आलाय. इथल्या अनाथांसाठी ताकद घेऊन..!ही कहाणी सुरू झाली आंध्र प्रदेशात. व्यंकटेश गोविंद रेड्डी आणि पौर्णिमा डेव्हीड काळे या दोघांनी आंतरजातीय लग्न केले. समाजाला हा विवाह खटकला. समाजकंटकांनी या दाम्पत्याचा खून केला. पण त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा जिवंत राहिला. आजोबांनी त्याला लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राम या अनाथाश्रमात नेऊन सोडून दिले. तो १८ वर्षांचा झाला अन् अनाथाश्रमाची दारेही त्याच्यासाठी बंद झाली. आता बाहेरच्या जागात आल्यावर त्याच्याकडे स्वत:चे नाव नव्हते, आडनाव नव्हते.त्यामुळे जातही नव्हती अन् जातीचे प्रमाणपत्रही नव्हते. घरच नव्हते, तर रहिवासी दाखला कुठून मिळणार? हे सगळे नव्हते म्हणून मतदार ओळखपत्र नव्हते अन् त्यामुळे तो भारताचा नागरिकही नव्हता!पण तो हरला नाही. उघड्या आकाशाखाली उपाशी निजला. पावसात भिजला. आंध्र प्रदेशातील आपल्या आजोबांचा शोध घेतला. आपले खरे नाव जाणून घेतले. साºया संकटांवर मात करत शिकला. एका कंपनीत इंजिनिअर झाला. पण गलेलठ्ठ पगार घेत सुखासीन आयुष्य जगण्यापेक्षा त्याने मागे वळून पाहिले. अनाथाश्रमातून १८ वर्षे पूर्ण करून बाहेरच्या जागात येणाऱ्या मुला-मुलींचे हाल आपण थांबविले पाहिजे, हा निर्धार केला. २००८ मध्ये सागरने मुंबईत एकता निराधार संघ स्थापन केला. स्वत:चा पूर्ण पगार पणास लावून दोन फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात अनाथांना ठेवले. जेऊ घातले. शिकवले. नोकरीलाही लावले.वणीत सुरू केले अनाथांसाठी वसतिगृहआज सागरच्या निराधार संघाच्या वसतिगृहात एकूण ४७८ अनाथ मुलं-मुली आहेत. तर आतापर्यंत सागरने ११२८ अनाथांना नोकरीला लावून दिले. तर अनाथाश्रमातून बाहेरच्या जगात येणाºया ६० मुलींचे सुयोग्य स्थळी लग्न लावून दिले. त्यांचे कन्यादान स्वत:च केले. आज एकता निराधार संघाच्या माध्यमातून सागरने मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर यासह कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, रायचूर आणि तेलंगणातील हैदराबादमध्ये अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहेत. आता तो विदर्भात पोहोचलाय. वणी येथील विजय नगराळे यांच्या माध्यमातून अनाथांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. १२ अनाथ मुला-मुलींना तेथे आश्रय मिळाला असून त्यांच्या शिक्षण, जेवण आणि निवासाची सोय झाली आहे.मदत करा.. मदत मिळवा!अनाथ सागर रेड्डीने वणीत अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. पण गरीब कुटुंबातील होतकरू मुला-मुलींना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गरजू मुला-मुलींनाही येथे आश्रय दिला जाईल, असे सागरने सांगितले. ज्यांना ज्यांना या वसतिगृहाची मदत हवी आहे, त्यांनी संपर्क साधावा, त्यासोबतच ज्यांना या कार्यासाठी मदत करायची इच्छा आहे, त्यांनीही संपर्क करावा, असे आवाहन सागर रेड्डीने केले आहे. तसेच पुढील महिन्यात बेरोजगार पण गरजू तरुण-तरुणींसाठी वणीमध्ये रोजगार मेळावा घेणार असल्याचेही त्याने सांगितले.