शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:35 IST

सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले.

ठळक मुद्दे४७८ अनाथांचा पिता : सागर रेड्डीच्या धडपडीची झेप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. त्या उत्तराचे नाव आहे, सागर रेड्डी!आंतरजातीय विवाह केलेल्या मायबापांच्या पोटी जन्माला आलेला हा पोरगा. आईबाबाचा खून झाला अन् तो अनाथ झाला. सागर रेड्डीची इथपर्यंतची कहाणी ‘सैराट’सारखीच. पण इथून पुढची कहाणी सिनेमाच्या पडद्यावर मावणारी नाही. हा अनाथ पोरगा आता इंजिनिअर झाला अन् शेकडो अनाथांचा पालक झाला. हा अनाथांचा नाथ सध्या यवतमाळात आलाय. इथल्या अनाथांसाठी ताकद घेऊन..!ही कहाणी सुरू झाली आंध्र प्रदेशात. व्यंकटेश गोविंद रेड्डी आणि पौर्णिमा डेव्हीड काळे या दोघांनी आंतरजातीय लग्न केले. समाजाला हा विवाह खटकला. समाजकंटकांनी या दाम्पत्याचा खून केला. पण त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा जिवंत राहिला. आजोबांनी त्याला लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राम या अनाथाश्रमात नेऊन सोडून दिले. तो १८ वर्षांचा झाला अन् अनाथाश्रमाची दारेही त्याच्यासाठी बंद झाली. आता बाहेरच्या जागात आल्यावर त्याच्याकडे स्वत:चे नाव नव्हते, आडनाव नव्हते.त्यामुळे जातही नव्हती अन् जातीचे प्रमाणपत्रही नव्हते. घरच नव्हते, तर रहिवासी दाखला कुठून मिळणार? हे सगळे नव्हते म्हणून मतदार ओळखपत्र नव्हते अन् त्यामुळे तो भारताचा नागरिकही नव्हता!पण तो हरला नाही. उघड्या आकाशाखाली उपाशी निजला. पावसात भिजला. आंध्र प्रदेशातील आपल्या आजोबांचा शोध घेतला. आपले खरे नाव जाणून घेतले. साºया संकटांवर मात करत शिकला. एका कंपनीत इंजिनिअर झाला. पण गलेलठ्ठ पगार घेत सुखासीन आयुष्य जगण्यापेक्षा त्याने मागे वळून पाहिले. अनाथाश्रमातून १८ वर्षे पूर्ण करून बाहेरच्या जागात येणाऱ्या मुला-मुलींचे हाल आपण थांबविले पाहिजे, हा निर्धार केला. २००८ मध्ये सागरने मुंबईत एकता निराधार संघ स्थापन केला. स्वत:चा पूर्ण पगार पणास लावून दोन फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात अनाथांना ठेवले. जेऊ घातले. शिकवले. नोकरीलाही लावले.वणीत सुरू केले अनाथांसाठी वसतिगृहआज सागरच्या निराधार संघाच्या वसतिगृहात एकूण ४७८ अनाथ मुलं-मुली आहेत. तर आतापर्यंत सागरने ११२८ अनाथांना नोकरीला लावून दिले. तर अनाथाश्रमातून बाहेरच्या जगात येणाºया ६० मुलींचे सुयोग्य स्थळी लग्न लावून दिले. त्यांचे कन्यादान स्वत:च केले. आज एकता निराधार संघाच्या माध्यमातून सागरने मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर यासह कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, रायचूर आणि तेलंगणातील हैदराबादमध्ये अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहेत. आता तो विदर्भात पोहोचलाय. वणी येथील विजय नगराळे यांच्या माध्यमातून अनाथांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. १२ अनाथ मुला-मुलींना तेथे आश्रय मिळाला असून त्यांच्या शिक्षण, जेवण आणि निवासाची सोय झाली आहे.मदत करा.. मदत मिळवा!अनाथ सागर रेड्डीने वणीत अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. पण गरीब कुटुंबातील होतकरू मुला-मुलींना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गरजू मुला-मुलींनाही येथे आश्रय दिला जाईल, असे सागरने सांगितले. ज्यांना ज्यांना या वसतिगृहाची मदत हवी आहे, त्यांनी संपर्क साधावा, त्यासोबतच ज्यांना या कार्यासाठी मदत करायची इच्छा आहे, त्यांनीही संपर्क करावा, असे आवाहन सागर रेड्डीने केले आहे. तसेच पुढील महिन्यात बेरोजगार पण गरजू तरुण-तरुणींसाठी वणीमध्ये रोजगार मेळावा घेणार असल्याचेही त्याने सांगितले.