शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

कुठे आहे कॉपीमुक्त अभियान? खिडकीतून कॉपी बहाद्दरांना केला जातोय पुरवठा

By अविनाश साबापुरे | Updated: March 11, 2024 20:12 IST

दहावी, बारावी परीक्षांचे व्हीडिओ व्हायरल : दारव्हा, दिग्रस तालुक्यात लक्ष कुणाचे?

यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान चक्क पोलिस आणि शिक्षकांच्या नजरेपुढे कॉपी पुरविण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. खिडकीतून परीक्षावर्गात कॉपीचा कागद फेकला जात असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभाग मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानासाठी नेमलेली भरारी पथके आहेत तरी कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.

पांढरकवडा तालुक्यातील केंद्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका अवघ्या काही मिनिटात सोशल मीडियात व्हायरल झाली होती. या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. तर दारव्हा तालुक्यातील चिखली येथील वसंत नाईक हायस्कूल या केंद्रावरील व्हीडिओ व्हायरल झाला. शाळेला संरक्षक भिंत नाही. वर्गखोल्यांच्या खिडक्या थेट रस्त्यावर आहे. याचाचा फायदा घेऊन या ठिकाणी काही जण परीक्षार्थींना कॉपी पुरवित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने येथील केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली. 

तसेच पोलीस संरक्षण घेऊन कॉपीला आळा घालावा आणि काही जण गोंधळ घालत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दिग्रस तालुक्यातील रुई तलाव परीक्षा केंद्रातही कॉपीमुक्त अभिनायाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. ७ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर सुरू असताना कॉपी पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची गर्दी या केंद्राबाहेर हजर होती. चक्क शाळेच्या कंपाऊंडवर चढून, खिडकीत लटकून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविल्याचा व्हीडिओ काही नागरिकांनी व्हायरल केला आहे. 

हा सर्व प्रकार केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत होतांना सुद्धा केंद्र प्रमुखांनी या प्रकारावर आळा घालण्याऐवजी या कडे दुर्लक्ष केल्याने कापी बहाद्दरांनी सर्व नियम मोळून आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांला कॉपी पोहचविण्यासाठी जीव मुठीत धरून कॉप्या पुरविल्या. पांढरकवडा, दिग्रस, दारव्हा यासह इतरही तालुक्यांमध्ये बऱ्याच केंद्रांवर कॉपी पुरविण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. हे प्रकार केंद्रावरी बैठे पथक, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, केंद्र प्रमुख यांच्या निदर्शनास कसे येत नाही, हा प्रश्न आहे. तर शिक्षण विभागाने नेमलेले सहा भरारी पथके नेमक्या याच केंद्रांवर का पोहोचत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बोर्ड मंजुरी देते तरी कोणत्या आधारावर?जिल्ह्यात यंदा ज्या केंद्रांवर काॅपीचा सुळसुळाट आढळत आहे, त्याच केंद्रांवर मागील वर्षीही काॅपी बहाद्दरांची गर्दी दिसली होती. असे असताना परीक्षा मंडळाने याच शाळांना यंदा दुसऱ्यांदा परीक्षा केंद्र कोणत्या आधारावर मंजूर केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र मंजूर करण्यापूर्वी शाळेला संरक्षक भिंत, बैठक व्यवस्था, आसन क्षमता, संलग्न गावांचे अंतर यासह विविध निकषात अनेक केंद्र बसत नाहीत. तरीही त्यांना मंजुरी का दिली जाते? त्यामागे आर्थिक हितसंबंध असल्याची जोरदार चर्चा आहे.

चिखली येथील परीक्षा केंद्रावर एक दिवस गोंधळ उडाल्याच्या तक्रारीनंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पोलीस संरक्षण घेऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.- विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी, दारव्हा 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ