शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माहिती आयुक्तांच्या नेमणुकांना मुहूर्त मिळणार तरी केव्हा? न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली

By अविनाश साबापुरे | Updated: February 11, 2024 17:09 IST

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकार करणार होते भरती

यवतमाळ : राज्यात माहिती आयुक्तांच्या जागा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. या जागा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरल्या जातील, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले होते. परंतु आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा लोटला तरी एकाही आयुक्तांची नेमणूक अद्याप झालेली नाही.महाराष्ट्राच्या माहिती आयोगात सध्यस्थितीत मुख्य माहिती आयुक्तांसह एकूण आठ आयुक्तांची पदे आहेत. त्यापैकी केवळ तीन आयुक्तांच्या जागा भरलेल्या आहेत. मुख्य माहिती आयुक्तांचे पद रिक्त असून प्रभारावर काम सुरू आहे.

आयुक्तांची कमतरता असल्याने नागरिकांनी माहिती अधिकारात टाकलेले द्वितीय अपिल मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहात आहेत. याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात द्वितीय अपिलांच्या सुनावणीसाठी वेळमर्यादा निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, आयुक्तांची कमतरता असल्याने द्वितीय अपिल प्रलंबित राहत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने या जागा भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यावर १३ डिसेंबर २०२३ रोजी राज्य सरकारच्या वकिलांनी आयुक्तांसह आयोगातील इतरही रिक्त जागा फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात भरण्यात येतील, अशी माहिती न्यायालयापुढे सादर केली होती. मात्र आता पहिला आठवडा उलटून गेला तरी आयुक्तांची पदे भरली गेली नाही. यातून न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली होत आहे. रिक्त पदांमुळे प्रलंबित अपिलांचे प्रमाण वाढत आहे. माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशाला बगल दिली जात आहे.

किमान न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार तरी शासनाने माहिती आयुक्तांच्या जागा भराव्या. कारण रिक्त पदांमुळे माहिती अधिकारातील द्वितीय आपिलावर सुनावणीची वेळ मर्यादा निश्चित करण्यासाठी अडचणी येत आहेत.- विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ता