शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : प्रशासनाला हवे गोदाम, पावसाळा तोंडावर तरी हरभरा घरातच

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शेतकऱ्याच्या कापूस व तूर खरेदीच्या अडचणीनंतर आता हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रबी हंगामात निघालेले हरभऱ्याचे पीक अजूनही घरात पडून आहे. शासन हरभरा खरेदी कधी सुरू करते, त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले. मात्र शासनाने हमी भावात हरभरा खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हरभरा विकावा लागत आहे. चार हजार ७०० रुपये हरभऱ्याचा आधारभूत भाव आहे. मात्र पैशांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना तो तीन ते साडेतीन हजारातच खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शासन व व्यापारी शेतकऱ्यांच्या पाटावर व पाठीवर असे दोनही बाजूने मारण्याचे काम सुरू आहे. गोडावून उपलब्ध नसल्याच्या कारणावरून हरभरा खरेदी होवू शकले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी धामणगाव येथील गोडावून आरक्षित केले आहे. आता त्या गोडावूनमध्ये रासायनिक खताचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडावूनचा अजूनही जिल्ह्याला ताबा मिळालेला नाही. तो कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोदामांअभावी थांबली हरभरा खरेदी : व्हीसीएमएसगोडावून उपलब्ध नसल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरच माहिती देण्यात आली आहे. लवकर हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती ‘व्हीसीएमएस’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरे यांनी दिली.शेतकरी संघर्ष समिती आक्रमकशेतकरी अनेक अडचणीत अडकला आहे. यात हरभरा खरेदीस दिरंगाई करून तो पुन्हा पिचला जाणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदी तत्काळ व्हावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, अशोक गोबरे, वसंत घुईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरणे, दिनेश गोगरकर, आनंदराव जगताप, घनश्याम दरणे, जयंत घोगे, अनिल गायकवाड आदींनी केली. लवकर हरभरा खरेदी करून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा, खरिपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी तो पैसा कामात येईल, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी