शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : प्रशासनाला हवे गोदाम, पावसाळा तोंडावर तरी हरभरा घरातच

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शेतकऱ्याच्या कापूस व तूर खरेदीच्या अडचणीनंतर आता हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रबी हंगामात निघालेले हरभऱ्याचे पीक अजूनही घरात पडून आहे. शासन हरभरा खरेदी कधी सुरू करते, त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले. मात्र शासनाने हमी भावात हरभरा खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हरभरा विकावा लागत आहे. चार हजार ७०० रुपये हरभऱ्याचा आधारभूत भाव आहे. मात्र पैशांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना तो तीन ते साडेतीन हजारातच खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शासन व व्यापारी शेतकऱ्यांच्या पाटावर व पाठीवर असे दोनही बाजूने मारण्याचे काम सुरू आहे. गोडावून उपलब्ध नसल्याच्या कारणावरून हरभरा खरेदी होवू शकले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी धामणगाव येथील गोडावून आरक्षित केले आहे. आता त्या गोडावूनमध्ये रासायनिक खताचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडावूनचा अजूनही जिल्ह्याला ताबा मिळालेला नाही. तो कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोदामांअभावी थांबली हरभरा खरेदी : व्हीसीएमएसगोडावून उपलब्ध नसल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरच माहिती देण्यात आली आहे. लवकर हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती ‘व्हीसीएमएस’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरे यांनी दिली.शेतकरी संघर्ष समिती आक्रमकशेतकरी अनेक अडचणीत अडकला आहे. यात हरभरा खरेदीस दिरंगाई करून तो पुन्हा पिचला जाणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदी तत्काळ व्हावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, अशोक गोबरे, वसंत घुईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरणे, दिनेश गोगरकर, आनंदराव जगताप, घनश्याम दरणे, जयंत घोगे, अनिल गायकवाड आदींनी केली. लवकर हरभरा खरेदी करून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा, खरिपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी तो पैसा कामात येईल, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी