शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

By admin | Updated: September 8, 2016 00:59 IST

दरवर्षी पैनगंगा नदीच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या रेडझोनमधील गावांचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही.

प्रशासन उदासीन : पैनगंगेच्या ‘रेड झोन’मधील गावांचा प्रश्नउमरखेड : दरवर्षी पैनगंगा नदीच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या रेडझोनमधील गावांचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. गेल्या दहा वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित राहिला आहे. राज्यात सरकार बदलल्यावर पूरग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सरकारला दोन वर्ष होऊनही हा प्रश्न कायमच आहे. अत्यंत विशाल पात्र असलेली पैनगंगा नदी उमरखेड तालुक्यासाठी जेवढी महत्वाची आहे, तेवढीच काठावरील गावांसाठी धोकादायकही ठरत आहे. पळशी, संगम चिंचोली, मार्लेगाव, गाडीबोरी, चातारी, देवसरी यासह अनेक गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. पावसाळ््यात गावकरी अक्षरश: मृत्युचा अनुभव घेतात. महापूर आला की, मुख्यमंत्र्यांपासून सर्व अधिकारी या भागात भेट देतात. पूरग्रस्तांना आश्वासनांची खैरात वाटतात. मात्र पूर ओसरल्यावर आश्वासनेही पुरातच वाहून जातात. उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला २००६ मध्ये महापुराला सामोरे जावे लागले होते. पुनर्वसनाच्या आश्वासनाचा पोटतिडकीने पाठपुरावा करण्यात आला. १९५८ आणि २००६ च्या महापुराने या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो नागरिक अडकून पडले होते. तेव्हापासून पुनर्वसनाची प्रक्रिया खोळंबली आहे. तिला अद्यापही गती मिळालेली नाही. २००६ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षभरात पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. पाऊस व इसापूर धरणाचे पाणी सोडल्यामुळे या भागात महापूर ही नित्याचीच बाब झाली आहे. पळशी येथील नागरिक पुनर्वसनासाठी वारंवार आंदोलन करतात. परंतु त्यांच्या मागणीला राजकीय पाठबळ मिळत नाही. म्हणूनच प्रशासनही या सर्व सामान्य गावकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. या गावासोबतच नदी तिरावरील अनेक गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात संगम चिंचोली, देवसरी, पळशी या गावांचा समावेश आहे. तहसीलदारांकडून पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव पुनर्वसन मंत्र्यांकडे पाठविला. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यात सरकार बदलल्यावर पुनर्वसनाच्या प्रश्नावर तातडीने कारवाई केली जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु भाजप-शिवसेनेचे सरकार येऊन दोन वर्षे झाली तरी उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे. (शहर प्रतिनिधी)