शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

By admin | Updated: September 8, 2016 00:59 IST

दरवर्षी पैनगंगा नदीच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या रेडझोनमधील गावांचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही.

प्रशासन उदासीन : पैनगंगेच्या ‘रेड झोन’मधील गावांचा प्रश्नउमरखेड : दरवर्षी पैनगंगा नदीच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या रेडझोनमधील गावांचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. गेल्या दहा वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित राहिला आहे. राज्यात सरकार बदलल्यावर पूरग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सरकारला दोन वर्ष होऊनही हा प्रश्न कायमच आहे. अत्यंत विशाल पात्र असलेली पैनगंगा नदी उमरखेड तालुक्यासाठी जेवढी महत्वाची आहे, तेवढीच काठावरील गावांसाठी धोकादायकही ठरत आहे. पळशी, संगम चिंचोली, मार्लेगाव, गाडीबोरी, चातारी, देवसरी यासह अनेक गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. पावसाळ््यात गावकरी अक्षरश: मृत्युचा अनुभव घेतात. महापूर आला की, मुख्यमंत्र्यांपासून सर्व अधिकारी या भागात भेट देतात. पूरग्रस्तांना आश्वासनांची खैरात वाटतात. मात्र पूर ओसरल्यावर आश्वासनेही पुरातच वाहून जातात. उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला २००६ मध्ये महापुराला सामोरे जावे लागले होते. पुनर्वसनाच्या आश्वासनाचा पोटतिडकीने पाठपुरावा करण्यात आला. १९५८ आणि २००६ च्या महापुराने या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो नागरिक अडकून पडले होते. तेव्हापासून पुनर्वसनाची प्रक्रिया खोळंबली आहे. तिला अद्यापही गती मिळालेली नाही. २००६ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षभरात पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. पाऊस व इसापूर धरणाचे पाणी सोडल्यामुळे या भागात महापूर ही नित्याचीच बाब झाली आहे. पळशी येथील नागरिक पुनर्वसनासाठी वारंवार आंदोलन करतात. परंतु त्यांच्या मागणीला राजकीय पाठबळ मिळत नाही. म्हणूनच प्रशासनही या सर्व सामान्य गावकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. या गावासोबतच नदी तिरावरील अनेक गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात संगम चिंचोली, देवसरी, पळशी या गावांचा समावेश आहे. तहसीलदारांकडून पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव पुनर्वसन मंत्र्यांकडे पाठविला. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यात सरकार बदलल्यावर पुनर्वसनाच्या प्रश्नावर तातडीने कारवाई केली जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु भाजप-शिवसेनेचे सरकार येऊन दोन वर्षे झाली तरी उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे. (शहर प्रतिनिधी)