शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

अतिक्रमण हटावला मुहूर्त कधी मिळणार ?

By admin | Updated: March 17, 2016 03:09 IST

शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी अद्याप नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही.

गल्लोगल्ली अतिक्रमण : वणीतील मोजकेच अतिक्रमण काढले, उर्वरित अतिक्रमण कायमचवणी : शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी अद्याप नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही. मंगळवारी केवळ विकास कामांत अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे आता सर्व अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद कधी पुढाकार घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वणी शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. कोळसा खाणींमुळे शहराची बरकत वाढली आहे. परिणामी लोकसंख्या फुगत आहे. त्याचा परिणाम शहरातील वास्तव्यावर होत आहे. आता नव्याने अनेक ले-आउट पडले. तेथे अनेकांनी घरे बांधली. तरीही शहरातील घरांवर ताण पडत आहे. त्यातून अतिक्रमणाची समस्या वाढत आहे. नागरिकांना राहायला घर नसताना दुकानदार दुकानासमोर अतिक्रमण करून शहरातील रस्ते अरूंद करीत आहेत. त्याचा विपरित ताण वाहतुकीवर होत आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील काही मार्गाने एकेरी वाहतूक सुरू झाली. अतिक्रमणामुळे ही एकेरी वाहतूक वादात सापडली होती. अखेर ती कशी तरी सुरू झाली. पोलिसांनी आधी अतिक्रमण हटवा, अशी भूमिका त्यावेळी घेतली होती. ती भूमिका रास्त होती. त्यामुळे त्यावेळी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र चारच दिवसांत ती गुंडाळण्यात आली होती. तेव्हापासून अतिक्रमण हटव मोहीम थंडावली आहे. ती अद्याप कायम आहे. दरम्यान मंगळवारी विकास कामांत अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. तेवढ्यावरची ही मोहीम पुन्हा थांबली आहे. आता अतिक्रमणधारक चांगलेच शिरजोर झाले आहे. अनेकांनी आपली दुकाने पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी थाटली आहेत. आता हे अतिक्रमण वाहतुकीस अडसर ठरत आहे. अनेक चौकांत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते अरूंद असल्याने अतिक्रमणाने ते पुन्हा लहान झाले आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संबंधित अतिक्रमण हटवून एकेरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेला मुहूर्तच मिळत नसल्याने ही समस्या अद्याप कायमच आहे. किमान टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँंक, टागोर चौक, तुटी कमान, दीपक टॉकिज, साई मंदिर, सर्वोदय चौक, आदी ठिकाणचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)