शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटावला मुहूर्त कधी मिळणार ?

By admin | Updated: March 17, 2016 03:09 IST

शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी अद्याप नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही.

गल्लोगल्ली अतिक्रमण : वणीतील मोजकेच अतिक्रमण काढले, उर्वरित अतिक्रमण कायमचवणी : शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी अद्याप नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही. मंगळवारी केवळ विकास कामांत अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे आता सर्व अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद कधी पुढाकार घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वणी शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. कोळसा खाणींमुळे शहराची बरकत वाढली आहे. परिणामी लोकसंख्या फुगत आहे. त्याचा परिणाम शहरातील वास्तव्यावर होत आहे. आता नव्याने अनेक ले-आउट पडले. तेथे अनेकांनी घरे बांधली. तरीही शहरातील घरांवर ताण पडत आहे. त्यातून अतिक्रमणाची समस्या वाढत आहे. नागरिकांना राहायला घर नसताना दुकानदार दुकानासमोर अतिक्रमण करून शहरातील रस्ते अरूंद करीत आहेत. त्याचा विपरित ताण वाहतुकीवर होत आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील काही मार्गाने एकेरी वाहतूक सुरू झाली. अतिक्रमणामुळे ही एकेरी वाहतूक वादात सापडली होती. अखेर ती कशी तरी सुरू झाली. पोलिसांनी आधी अतिक्रमण हटवा, अशी भूमिका त्यावेळी घेतली होती. ती भूमिका रास्त होती. त्यामुळे त्यावेळी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र चारच दिवसांत ती गुंडाळण्यात आली होती. तेव्हापासून अतिक्रमण हटव मोहीम थंडावली आहे. ती अद्याप कायम आहे. दरम्यान मंगळवारी विकास कामांत अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. तेवढ्यावरची ही मोहीम पुन्हा थांबली आहे. आता अतिक्रमणधारक चांगलेच शिरजोर झाले आहे. अनेकांनी आपली दुकाने पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी थाटली आहेत. आता हे अतिक्रमण वाहतुकीस अडसर ठरत आहे. अनेक चौकांत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते अरूंद असल्याने अतिक्रमणाने ते पुन्हा लहान झाले आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संबंधित अतिक्रमण हटवून एकेरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेला मुहूर्तच मिळत नसल्याने ही समस्या अद्याप कायमच आहे. किमान टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँंक, टागोर चौक, तुटी कमान, दीपक टॉकिज, साई मंदिर, सर्वोदय चौक, आदी ठिकाणचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)