शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

गहू झोपला, मोहोर झडला

By admin | Updated: February 12, 2015 01:49 IST

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यवतमाळ : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश भागातील गहू झोपला असून बहरलेल्या आंब्याचा मोहोर झडला आहे. शिवाय कापूस पणन महासंघाचा कापूस १५ दिवसानंतर पुन्हा भिजला. काही भागात वीज पुरवठाही ठप्प झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीज सुरळीत करण्याचे काम कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.यावर्षी खरिपापासूनच शेतकऱ्यांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. उशिराचा पाऊस आणि नंतर ‘ब्रेक के बाद’च्या पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीनचे पीक काहींना एकरी ५० किलोही झाले नाही. शिवाय दर्जाही घसरला. यातून सुटका होत नाही तोच कपाशीनेही दगा दिला. एकीकडे उत्पादन कमी तर, दुसरीकडे कमी दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातून सुटका होत नाही तोच रबीतही अवकाळी पावसाचा मारा झेलावा लागत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कपाशी आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. यातून सावरच नाही तोच मंगळवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला.या पावसामुळे ३१ हजार २८० हेक्टरवरील गव्हाला फटका बसला आहे. पावसासह जोरदार वारा असल्याने ओंब्यावर आलेला गहू आडवा झाला. त्यामुळे गव्हाचे उत्पादन घटण्याचाही धोका आहे. यासोबतच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा बार मोठ्या प्रमाणात गळला. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादनही घटण्याचा धोका आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाला बसला. यवतमाळ विभागातील सातही केंद्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक नुकसानीचा अंदाज घेणार आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कापूस ओला झाला होता. असे नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या सूचना होत्या. यानंतरही ताडपत्र्या उडाल्याने कापूस भिजला. मात्र नुकसानीचे प्रमाण कळू शकले नाही. यवतमाळ, कळंब, आर्णी, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या संकलन केंद्रांवर झालेले नुकसान चमू शोधत आहे. हवामान खात्याने आणखी तीन दिवस सतर्कतेची सूचना दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पणनची कापूस खरेदी बंद राहणार आहे. बिजोरा परिसरात पावसामुळे गहू पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हजारो हेक्टर क्षेत्रातील गहू पावसामुळे जमीनदोस्त झाला. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाभूळगाव परिसरात जवळपास दोन तास पाऊस झाला. सोंगलेल्या तुरीच्या पेट्या झाकण्यासाठी त्यांना रात्रीच शेताकडे धाव घ्यावी लागली. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोख पसरला होता. महागाव तालुक्यात यावर्षी उन्हाळी ज्वारी हा नवा प्रयोग शेतकऱ्यांनी केला. मात्र हे पीकही मंगळवारच्या पावसामुळे जमीनदोस्त झाले. शिवाय गव्हालाही फटका बसला. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडले तर वीज पुरवठाही खंडित झाला होता. नुकसानीच्या पाहणीसंदर्भात तहसीलदार विकास माने आणि तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांना विचारले असता अद्याप तरी या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. (लोकमत चमू)