शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:11 IST

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणाचे दावे करणारी अनेक उत्पादने बाजारातन्यू व्हायरस शटआऊट लॉकेटअतिनिल अल्ट्राव्हायलेट लाईटचा सर्रास वापर, कॅन्सरचाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता आहे. त्यासाठी सर्वच जण शक्य त्या उपाययोजना करण्यास तयार आहे. जनमानसातील कोरोनाची भीती ओळखून ती कॅश करण्याकरिता अनेक उत्पादने बाजारात आली आहे. त्याचे फायदेही तितक्याच सराईत पणे पटवून दिले जात असल्याने अनेक जण त्याला खरेदी करण्यासाठी धडपडत आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे. त्यासाठी न्यू व्हायरस शटआऊट असे लॉकेट गळ्यात घातल्यास तीन फुटाच्या परिघात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नसल्याचे सांगितले जात आहे. या न्यू व्हायरस शटआऊट लॉकेटची किंमतही हजाराच्यावरच आहे. अनेक जण आता हे लॉकेट गळ्यात घालून फिरताना दिसत आहे.

घरातील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट लाईटचा प्रयोग केला जात आहे. मात्र अनेक जण हा प्रयोग मानवी शरीरासाठी घातक असल्याचे सांगतात. हा लाईट घरातील एका खोलीत काही मिनिट लावून ठेवल्यास तेथील सर्व प्रकारचे व्हायरस नष्ट होतात, असा दावा केला जात आहे. तर निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अल्ट्राव्हायलेट लाईट खासगी कार्यालयातील टेबल खुर्च्यांवरून फिरविला जात आहे. या उत्पादनाची किंमतही पाच हजारांच्यापुढेच आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे असे अनेक जण या उत्पादनाची खरेदी करताना दिसत आहे. अल्ट्राव्हायलेट सारखे घातक किरणे उत्सर्जित करणारी उत्पादने बाजारात कुठल्याही निर्बंधाशिवाय विकली जात आहे. याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अतिनील किरणे मानवी शरीरावर पडल्यास त्यातून कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी असलेली उत्पादने विकणाऱ्या कंपन्या अनेक दावे करीत आहे. त्याचे मार्केटिंग प्रतिनिधी उत्पादनाची माहिती देताना दिसतात. या दाव्यांना शास्त्रीय आधार काय हे मात्र कुणीच सांगायला तयार नाही. जनमाणसातील कोरोनाच्या भीतीला काही उत्पादकांनी संधी बनविल्याचे दिसून येते. याची शासकीय यंत्रणेने दखल घेण्याची गरज आहे.आधी काढ्यावर भर, नंतर दिसले दुष्परिणामकोरोना विषाणू संसर्गाचा विळखा वाढत असून रुग्णसंख्या साडेसात हजारांच्यापुढे गेली आहे. मृतांचाही आकडा वाढतो आहे. आता प्रत्येकालाच स्वत:सह कुटुंबाची चिंता सतावत आहे. कोरोना होऊच नये, त्याला प्रतिबंधक करावा यासाठी सुरुवातीच्या काळात आयुर्वेदातील उपचार, काढा, याशिवाय दैनंदिन वापरातील खाद्य पदार्थ यावर भर दिला जात होता. शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी काढ्याचा प्रयोग अनेकांनी केला. त्याचे कमी जास्त प्रमाणात दुष्परिणामही जाणवले. मालेगाव काढा तर राज्यात प्रसिद्ध झाला होता. नंतर त्याचे अतिसेवनाने काय परिणाम झाले हेही वास्तव सर्वश्रृत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस