शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:11 IST

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणाचे दावे करणारी अनेक उत्पादने बाजारातन्यू व्हायरस शटआऊट लॉकेटअतिनिल अल्ट्राव्हायलेट लाईटचा सर्रास वापर, कॅन्सरचाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता आहे. त्यासाठी सर्वच जण शक्य त्या उपाययोजना करण्यास तयार आहे. जनमानसातील कोरोनाची भीती ओळखून ती कॅश करण्याकरिता अनेक उत्पादने बाजारात आली आहे. त्याचे फायदेही तितक्याच सराईत पणे पटवून दिले जात असल्याने अनेक जण त्याला खरेदी करण्यासाठी धडपडत आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे. त्यासाठी न्यू व्हायरस शटआऊट असे लॉकेट गळ्यात घातल्यास तीन फुटाच्या परिघात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नसल्याचे सांगितले जात आहे. या न्यू व्हायरस शटआऊट लॉकेटची किंमतही हजाराच्यावरच आहे. अनेक जण आता हे लॉकेट गळ्यात घालून फिरताना दिसत आहे.

घरातील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट लाईटचा प्रयोग केला जात आहे. मात्र अनेक जण हा प्रयोग मानवी शरीरासाठी घातक असल्याचे सांगतात. हा लाईट घरातील एका खोलीत काही मिनिट लावून ठेवल्यास तेथील सर्व प्रकारचे व्हायरस नष्ट होतात, असा दावा केला जात आहे. तर निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अल्ट्राव्हायलेट लाईट खासगी कार्यालयातील टेबल खुर्च्यांवरून फिरविला जात आहे. या उत्पादनाची किंमतही पाच हजारांच्यापुढेच आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे असे अनेक जण या उत्पादनाची खरेदी करताना दिसत आहे. अल्ट्राव्हायलेट सारखे घातक किरणे उत्सर्जित करणारी उत्पादने बाजारात कुठल्याही निर्बंधाशिवाय विकली जात आहे. याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अतिनील किरणे मानवी शरीरावर पडल्यास त्यातून कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी असलेली उत्पादने विकणाऱ्या कंपन्या अनेक दावे करीत आहे. त्याचे मार्केटिंग प्रतिनिधी उत्पादनाची माहिती देताना दिसतात. या दाव्यांना शास्त्रीय आधार काय हे मात्र कुणीच सांगायला तयार नाही. जनमाणसातील कोरोनाच्या भीतीला काही उत्पादकांनी संधी बनविल्याचे दिसून येते. याची शासकीय यंत्रणेने दखल घेण्याची गरज आहे.आधी काढ्यावर भर, नंतर दिसले दुष्परिणामकोरोना विषाणू संसर्गाचा विळखा वाढत असून रुग्णसंख्या साडेसात हजारांच्यापुढे गेली आहे. मृतांचाही आकडा वाढतो आहे. आता प्रत्येकालाच स्वत:सह कुटुंबाची चिंता सतावत आहे. कोरोना होऊच नये, त्याला प्रतिबंधक करावा यासाठी सुरुवातीच्या काळात आयुर्वेदातील उपचार, काढा, याशिवाय दैनंदिन वापरातील खाद्य पदार्थ यावर भर दिला जात होता. शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी काढ्याचा प्रयोग अनेकांनी केला. त्याचे कमी जास्त प्रमाणात दुष्परिणामही जाणवले. मालेगाव काढा तर राज्यात प्रसिद्ध झाला होता. नंतर त्याचे अतिसेवनाने काय परिणाम झाले हेही वास्तव सर्वश्रृत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस