शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अमृत योजनेच्या कामावर विरोधी पक्ष गप्प का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:57 IST

बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देबेंबळाचे पाणी यवतमाळात : सामाजिक संस्थाही मूग गिळून

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. असे असताना या बेंबळाच्या पाण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच नेहमी छुटपुट मुद्यावर आंदोलन करणारे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय संघटना काही एक बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये या बघ्याची भूमिका घेणाऱ्यांविरोधात तीव्र असंतोषही धुमसत आहे.निळोणा व चापडोह धरणावरुन यवतमाळ शहराची तहान भागू शकत नाही म्हणून बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळकरांसाठी पाणी आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अमृत योजनेतून २७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ठरल्याप्रमाणे आॅक्टोबर २०१९ ला बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार होते. परंतु घाईघाईने २०१८ ला या कामाचे उद्घाटन करून उन्हाळ्यापूर्वी पाणी आणण्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली. बेंबळाचे पाणी येणार, भटकंती थांबणार म्हणून नागरिकही सुखावले. परंतु प्रत्यक्षात यवतमाळकरांचा भ्रमनिरास झाला. सलग दुसरा उन्हाळा संपायला आला तरी बेंबळाच्या पाण्याचा पत्ता नाही.बेंबळाचे पाणी नियोजित वेळेपूर्वी यवतमाळात न्यायचे म्हणून वेगवान पद्धतीने पाईपचा पुरवठा केला गेला. त्या गोंधळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या पाईपच्या दर्जा व गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. तातडीने पाईप द्यायचे आहे म्हणून कदाचित पुरवठादार कंपनीनेही या पाईपच्या दर्जावर लक्ष दिले नसावे. अखेर पहिल्याच टेस्टींगमध्ये या पाईपची गुणवत्ता उघडी पडली. त्यातील भ्रष्टाचाराची उघड चर्चा होऊ लागली. निकृष्ट पाईपमुळे या योजनेच्या कामाचा बराच महत्वाचा अवधी निघून गेला. आता पाच महिन्यांवर या योजनेची डेड लाईन आली आहे. सध्याची संथगती पाहता वेळेत ही योजना पूर्ण होईल, असे दिसत नाही. राजकीय श्रेयासाठी सत्ताधाºयांनी घाईगडब केल्यानेच या योनजेच्या पूर्णत्वाला विलंब होत असल्याचे सांगितले जाते.बेंबळावरून पाणी आणण्याच्या २७७ कोटींच्या या योजनेत सुमारे वर्षभरापासून बराच गोंधळ सुरू आहे. पाईपची निकृष्टतता व त्यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. परंतु त्यानंतरही विरोधी बाकावर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष, संघटना या मुद्यावर काही एक बोलत नसल्याने त्यांच्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. विरोधक शांत असल्यानेच बेंबळाच्या पाण्याला विलंब होऊनही सत्ताधारी मंडळी अगदी निश्चिंत आहेत. विरोधी नेतृत्वच पुढाकार घेत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जनतेलाही नाईलाजाने शांत रहावे लागत आहे.अपेक्षाभंगाचा सत्ताधाºयांना फटकासत्ताधाºयांनी बेंबळाचे पाणी नियोजित वेळेच्या एक वर्षआधी आणण्यासाठी आग्रह धरल्यापासूनच या योजनेला ग्रहण लागले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन राजकीय लाभ मिळेल, असा सत्ताधाºयांचा लवकर पाणी आणण्यामागे हेतू होता. मात्र प्रत्यक्षात पाणीच न आल्याने हा हेतू साध्य झाला नाही. उलट अपेक्षा दाखवून प्रत्यक्षात त्याची पूर्तता न केल्याने जनतेत रोष निर्माण झाला. त्याचा राजकीय फटका सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण