शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

अमृत योजनेच्या कामावर विरोधी पक्ष गप्प का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:57 IST

बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देबेंबळाचे पाणी यवतमाळात : सामाजिक संस्थाही मूग गिळून

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. असे असताना या बेंबळाच्या पाण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच नेहमी छुटपुट मुद्यावर आंदोलन करणारे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय संघटना काही एक बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये या बघ्याची भूमिका घेणाऱ्यांविरोधात तीव्र असंतोषही धुमसत आहे.निळोणा व चापडोह धरणावरुन यवतमाळ शहराची तहान भागू शकत नाही म्हणून बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळकरांसाठी पाणी आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अमृत योजनेतून २७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ठरल्याप्रमाणे आॅक्टोबर २०१९ ला बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार होते. परंतु घाईघाईने २०१८ ला या कामाचे उद्घाटन करून उन्हाळ्यापूर्वी पाणी आणण्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली. बेंबळाचे पाणी येणार, भटकंती थांबणार म्हणून नागरिकही सुखावले. परंतु प्रत्यक्षात यवतमाळकरांचा भ्रमनिरास झाला. सलग दुसरा उन्हाळा संपायला आला तरी बेंबळाच्या पाण्याचा पत्ता नाही.बेंबळाचे पाणी नियोजित वेळेपूर्वी यवतमाळात न्यायचे म्हणून वेगवान पद्धतीने पाईपचा पुरवठा केला गेला. त्या गोंधळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या पाईपच्या दर्जा व गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. तातडीने पाईप द्यायचे आहे म्हणून कदाचित पुरवठादार कंपनीनेही या पाईपच्या दर्जावर लक्ष दिले नसावे. अखेर पहिल्याच टेस्टींगमध्ये या पाईपची गुणवत्ता उघडी पडली. त्यातील भ्रष्टाचाराची उघड चर्चा होऊ लागली. निकृष्ट पाईपमुळे या योजनेच्या कामाचा बराच महत्वाचा अवधी निघून गेला. आता पाच महिन्यांवर या योजनेची डेड लाईन आली आहे. सध्याची संथगती पाहता वेळेत ही योजना पूर्ण होईल, असे दिसत नाही. राजकीय श्रेयासाठी सत्ताधाºयांनी घाईगडब केल्यानेच या योनजेच्या पूर्णत्वाला विलंब होत असल्याचे सांगितले जाते.बेंबळावरून पाणी आणण्याच्या २७७ कोटींच्या या योजनेत सुमारे वर्षभरापासून बराच गोंधळ सुरू आहे. पाईपची निकृष्टतता व त्यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. परंतु त्यानंतरही विरोधी बाकावर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष, संघटना या मुद्यावर काही एक बोलत नसल्याने त्यांच्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. विरोधक शांत असल्यानेच बेंबळाच्या पाण्याला विलंब होऊनही सत्ताधारी मंडळी अगदी निश्चिंत आहेत. विरोधी नेतृत्वच पुढाकार घेत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जनतेलाही नाईलाजाने शांत रहावे लागत आहे.अपेक्षाभंगाचा सत्ताधाºयांना फटकासत्ताधाºयांनी बेंबळाचे पाणी नियोजित वेळेच्या एक वर्षआधी आणण्यासाठी आग्रह धरल्यापासूनच या योजनेला ग्रहण लागले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन राजकीय लाभ मिळेल, असा सत्ताधाºयांचा लवकर पाणी आणण्यामागे हेतू होता. मात्र प्रत्यक्षात पाणीच न आल्याने हा हेतू साध्य झाला नाही. उलट अपेक्षा दाखवून प्रत्यक्षात त्याची पूर्तता न केल्याने जनतेत रोष निर्माण झाला. त्याचा राजकीय फटका सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण