शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पहिल्या कृषिमंत्र्यांना काय वाटत असेल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:11 IST

देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला.

ठळक मुद्देकाय पेरले, काय उगवले : भाऊसाहेबांची पुण्यतिथी अन् शेतकरी आत्महत्येची सल

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला. एकीकडे भाऊसाहेबांना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे भाऊसाहेबांचाच कास्तकार गडी मात्र दुनियेला कंटाळून जगणे झिडकारून निघून गेला... जाताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या आत्महत्येला जबाबदार राहतील, असे अंत:करणाचे बोल तोडक्या मोडक्या शब्दात लिहून गेला... हा विरोधाभास, विसंगती की कृषिव्यवस्थेचे व्यंग!घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावातून मंगळवारी एका शेतकऱ्याचे कलेवर यवतमाळात पोहोचले. त्याने गळफास घेतला मग विष घेतले अन् कायमचा गेला. यवतमाळात त्यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम सुरू होते. सोशल मीडियातून पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन करणारे संदेश फिरत होते. अन् त्याचवेळी भाऊसाहेबांच्याच कास्तकार गड्याने प्राण त्यागल्याचे वृत्तही धडकले.भाऊसाहेबांनी शेतीच्या उत्थानासाठी अन् शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सारे काही केले. स्वत: साडेचारशे एकर जमीन देऊन विदर्भात कृषी विद्यापीठ आणले. त्याच कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषी विज्ञान केंद्र आले आहे.त्याच विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालय आले आहे. याच दोन वास्तूंच्या पुढे मंगळवारी राजूरवाडीच्या शेतकऱ्याचे कलेवर उत्तरीय तपासणीसाठी आले होते. एकीकडे शेतकºयांसाठी जीवन अर्पण केलेल्या पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन अन् दुसरीकडे शेतकºयाची आत्महत्या, असे भयंकर चित्र यवतमाळात मंगळवारी पाहायला मिळाले. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी स्वप्न पेरणाऱ्या कृषिमंत्र्यांना काय वाटले असेल..!कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ ?शेतकºयांच्या आत्महत्यांची आता जिल्ह्याला नव्हाळीच उरलेली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावरही सरकारी पक्षाचे काळीज हलले नाही. कृषी विज्ञान केंद्रापुढे असलेल्या शवविच्छेदन गृहात दिवसभर शंकर चायरे यांचा मृतदेह पडून होता. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने तिथे ठिय्या दिला. मात्र नरेंद्र मोदींचे नाव घेऊन शेतकरी गेलेला असतानाही सरकार पक्षातील आमदार, खासदार, पालकमंत्री चार पावलावर पोहोचू शकले नाही. देशाच्या पहिल्या कृषिमंत्र्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करणारी आजची कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ उरली, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.