शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या कृषिमंत्र्यांना काय वाटत असेल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:11 IST

देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला.

ठळक मुद्देकाय पेरले, काय उगवले : भाऊसाहेबांची पुण्यतिथी अन् शेतकरी आत्महत्येची सल

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला. एकीकडे भाऊसाहेबांना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे भाऊसाहेबांचाच कास्तकार गडी मात्र दुनियेला कंटाळून जगणे झिडकारून निघून गेला... जाताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या आत्महत्येला जबाबदार राहतील, असे अंत:करणाचे बोल तोडक्या मोडक्या शब्दात लिहून गेला... हा विरोधाभास, विसंगती की कृषिव्यवस्थेचे व्यंग!घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावातून मंगळवारी एका शेतकऱ्याचे कलेवर यवतमाळात पोहोचले. त्याने गळफास घेतला मग विष घेतले अन् कायमचा गेला. यवतमाळात त्यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम सुरू होते. सोशल मीडियातून पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन करणारे संदेश फिरत होते. अन् त्याचवेळी भाऊसाहेबांच्याच कास्तकार गड्याने प्राण त्यागल्याचे वृत्तही धडकले.भाऊसाहेबांनी शेतीच्या उत्थानासाठी अन् शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सारे काही केले. स्वत: साडेचारशे एकर जमीन देऊन विदर्भात कृषी विद्यापीठ आणले. त्याच कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषी विज्ञान केंद्र आले आहे.त्याच विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालय आले आहे. याच दोन वास्तूंच्या पुढे मंगळवारी राजूरवाडीच्या शेतकऱ्याचे कलेवर उत्तरीय तपासणीसाठी आले होते. एकीकडे शेतकºयांसाठी जीवन अर्पण केलेल्या पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन अन् दुसरीकडे शेतकºयाची आत्महत्या, असे भयंकर चित्र यवतमाळात मंगळवारी पाहायला मिळाले. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी स्वप्न पेरणाऱ्या कृषिमंत्र्यांना काय वाटले असेल..!कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ ?शेतकºयांच्या आत्महत्यांची आता जिल्ह्याला नव्हाळीच उरलेली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावरही सरकारी पक्षाचे काळीज हलले नाही. कृषी विज्ञान केंद्रापुढे असलेल्या शवविच्छेदन गृहात दिवसभर शंकर चायरे यांचा मृतदेह पडून होता. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने तिथे ठिय्या दिला. मात्र नरेंद्र मोदींचे नाव घेऊन शेतकरी गेलेला असतानाही सरकार पक्षातील आमदार, खासदार, पालकमंत्री चार पावलावर पोहोचू शकले नाही. देशाच्या पहिल्या कृषिमंत्र्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करणारी आजची कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ उरली, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.