शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

पहिल्या कृषिमंत्र्यांना काय वाटत असेल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:11 IST

देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला.

ठळक मुद्देकाय पेरले, काय उगवले : भाऊसाहेबांची पुण्यतिथी अन् शेतकरी आत्महत्येची सल

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला. एकीकडे भाऊसाहेबांना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे भाऊसाहेबांचाच कास्तकार गडी मात्र दुनियेला कंटाळून जगणे झिडकारून निघून गेला... जाताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या आत्महत्येला जबाबदार राहतील, असे अंत:करणाचे बोल तोडक्या मोडक्या शब्दात लिहून गेला... हा विरोधाभास, विसंगती की कृषिव्यवस्थेचे व्यंग!घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावातून मंगळवारी एका शेतकऱ्याचे कलेवर यवतमाळात पोहोचले. त्याने गळफास घेतला मग विष घेतले अन् कायमचा गेला. यवतमाळात त्यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम सुरू होते. सोशल मीडियातून पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन करणारे संदेश फिरत होते. अन् त्याचवेळी भाऊसाहेबांच्याच कास्तकार गड्याने प्राण त्यागल्याचे वृत्तही धडकले.भाऊसाहेबांनी शेतीच्या उत्थानासाठी अन् शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सारे काही केले. स्वत: साडेचारशे एकर जमीन देऊन विदर्भात कृषी विद्यापीठ आणले. त्याच कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषी विज्ञान केंद्र आले आहे.त्याच विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालय आले आहे. याच दोन वास्तूंच्या पुढे मंगळवारी राजूरवाडीच्या शेतकऱ्याचे कलेवर उत्तरीय तपासणीसाठी आले होते. एकीकडे शेतकºयांसाठी जीवन अर्पण केलेल्या पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन अन् दुसरीकडे शेतकºयाची आत्महत्या, असे भयंकर चित्र यवतमाळात मंगळवारी पाहायला मिळाले. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी स्वप्न पेरणाऱ्या कृषिमंत्र्यांना काय वाटले असेल..!कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ ?शेतकºयांच्या आत्महत्यांची आता जिल्ह्याला नव्हाळीच उरलेली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावरही सरकारी पक्षाचे काळीज हलले नाही. कृषी विज्ञान केंद्रापुढे असलेल्या शवविच्छेदन गृहात दिवसभर शंकर चायरे यांचा मृतदेह पडून होता. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने तिथे ठिय्या दिला. मात्र नरेंद्र मोदींचे नाव घेऊन शेतकरी गेलेला असतानाही सरकार पक्षातील आमदार, खासदार, पालकमंत्री चार पावलावर पोहोचू शकले नाही. देशाच्या पहिल्या कृषिमंत्र्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करणारी आजची कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ उरली, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.