शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

साखर कारखाना वाचविण्याची धडपड आताच का?

By admin | Updated: January 21, 2016 02:21 IST

सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही.

महागाव : सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही. आता राज्य बँकेने साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि खडबडून जागे झालेल्या काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखाना वाचविण्यासाठी आताच का धडपड, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक साखर कारखाना २०१२ सालापासून बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहे. गेल्या चार वर्षात कारखाना सुरू करावा, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. कारखाना सुरू असताना आंदोलने करून प्रशासनाला सळो की पळो करण्यात आले. त्यानंतर वारणा ग्रुपने भाडेतत्त्वावर कारखाना घेतल्यानंतर त्यांनाही हा कारखाना अर्ध्यावरच करार मोडावा लागला. त्यानंतर कारखान्याला कायमचे टाळे लागले ते आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, थकीत कर्जासाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. कारखाना विकण्याची नोटीस काढली. दरम्यानच्या चार वर्षात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा आंदोलने केले नाही. मात्र कारखाना विक्रीला निघत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलनाची भाषा केली. परंतु त्यातही नेते मात्र बाजूलाच दिसत आहे. कारखाना वाचविण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहालाही शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकही नेता बैठा सत्याग्रहाकडे फिरकला नाही. आता आमदार मनोहरराव नाईकांना निवेदन देवून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निवेदन दिल्या गेले. मात्र हा कारखाना विक्रीस काढल्यावर जाग का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना सुरू व्हावा, अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारणविरहीत प्रयत्न होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)