शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

साखर कारखाना वाचविण्याची धडपड आताच का?

By admin | Updated: January 21, 2016 02:21 IST

सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही.

महागाव : सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही. आता राज्य बँकेने साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि खडबडून जागे झालेल्या काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखाना वाचविण्यासाठी आताच का धडपड, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक साखर कारखाना २०१२ सालापासून बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहे. गेल्या चार वर्षात कारखाना सुरू करावा, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. कारखाना सुरू असताना आंदोलने करून प्रशासनाला सळो की पळो करण्यात आले. त्यानंतर वारणा ग्रुपने भाडेतत्त्वावर कारखाना घेतल्यानंतर त्यांनाही हा कारखाना अर्ध्यावरच करार मोडावा लागला. त्यानंतर कारखान्याला कायमचे टाळे लागले ते आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, थकीत कर्जासाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. कारखाना विकण्याची नोटीस काढली. दरम्यानच्या चार वर्षात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा आंदोलने केले नाही. मात्र कारखाना विक्रीला निघत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलनाची भाषा केली. परंतु त्यातही नेते मात्र बाजूलाच दिसत आहे. कारखाना वाचविण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहालाही शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकही नेता बैठा सत्याग्रहाकडे फिरकला नाही. आता आमदार मनोहरराव नाईकांना निवेदन देवून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निवेदन दिल्या गेले. मात्र हा कारखाना विक्रीस काढल्यावर जाग का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना सुरू व्हावा, अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारणविरहीत प्रयत्न होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)