शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:55 IST

कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

ठळक मुद्देखोपडीची यशोगाथा : श्रमदानातून १४ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमतेची झाली निर्मिती

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.केवळ दीड महिन्यात या गावात सह हजार ४५६ घनमीटर श्रमदान व एक लाख २४ हजार २६३ घनमीटर यंत्रकाम, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम गावात पूर्ण झाले. यामुळे गावात १३ कोटी ७१ लाख नऊ हजार लीटर पाणीसाठा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पातळी वाढली. त्यामुळे गावाचा पाणी प्रश्न मिटला. शिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. खोपडी (बु.) येथील जमीन सुपीक आहे. कधी काळी सिंचनाकरिता मुबलक पाणी मिळत असल्यामुळे खरीप, रबी हंगाम, तसेच फळबाग, भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याअभावी सिंचनाची समस्या जाणवू लागली. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. यामुळे गावाची स्थिती गंभीर बनली.गेल्या काही वर्षांपासून या भागात पर्जन्यमान चांगले नाही. शिवाय तिन्ही बाजूंनी माळरान डोंगर आणि उतारात गाव, अशी खोपडीची स्थिती असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी गावात न मुरता बाहेर निघून जात होते. ही बाब गावाच्या दुष्काळाला कारणीभूत असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. पाणी अडविल्याशिवाय पातळी वाढणार नाही याची जाणीव त्यांना झाली. नंतर खोपडीची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता निवड झाली. दत्तात्रय राहाणे यांनी गावकºयांच्या साथीने पुढाकार घेतला अन् तेथूनच खºया अर्थाने गावाच्या विकासाला सुरुवात झाली.पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांनी गावकºयांना स्पर्धेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी गावात बैठक घेऊन गावकºयांचा उत्साह वाढविला. ८ एप्रिलला रात्री बारा वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. ५00 घनमीटर सीसीटी, तीन शेततळे, २00 मीटर दगडीबांध, १४00 मीटर कंटूर बांध, दहा एलबीएस, तर यंत्राने १७ हजार घनमीटर सीसीटी, १५ शेततळे, तीन गॅबियन बंधारे, दोन सिमेंट नालाबांध, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम पूर्ण झाले. यामुळे १३ कोटी ७१ लाख लिटर पाणीसाठा तयार झाला.इतर गावांना प्रेरणादायी वाटगावात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली. आता गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तर सुटलीच, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले. सर्वांनी एकदिलाने परिश्रम घेतले आणि यश संपादन केले. गावकºयांच्या घामाचा हा सुगंध अनेक वर्षे दरवळत राहील. खोपडीवासीयांचा हा प्रवास दुष्काळग्रस्त गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा आहे.तालुक्यातून प्रथम येण्यासाठी गावकरी या स्पर्धेत ईर्षेने उतरले. मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने हिरमोड झाला. तथापि यानिमित्ताने सर्वांच्या परिश्रमामुळे भरपूर कामे झाली. त्याचा चांगला लाभ गावाला होईल. ही बाब कोणत्याही पुरस्कारापेक्षा निश्चितच मोठी आहे.- दत्तात्रय राहणे, खोपडी.