शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:55 IST

कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

ठळक मुद्देखोपडीची यशोगाथा : श्रमदानातून १४ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमतेची झाली निर्मिती

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.केवळ दीड महिन्यात या गावात सह हजार ४५६ घनमीटर श्रमदान व एक लाख २४ हजार २६३ घनमीटर यंत्रकाम, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम गावात पूर्ण झाले. यामुळे गावात १३ कोटी ७१ लाख नऊ हजार लीटर पाणीसाठा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पातळी वाढली. त्यामुळे गावाचा पाणी प्रश्न मिटला. शिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. खोपडी (बु.) येथील जमीन सुपीक आहे. कधी काळी सिंचनाकरिता मुबलक पाणी मिळत असल्यामुळे खरीप, रबी हंगाम, तसेच फळबाग, भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याअभावी सिंचनाची समस्या जाणवू लागली. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. यामुळे गावाची स्थिती गंभीर बनली.गेल्या काही वर्षांपासून या भागात पर्जन्यमान चांगले नाही. शिवाय तिन्ही बाजूंनी माळरान डोंगर आणि उतारात गाव, अशी खोपडीची स्थिती असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी गावात न मुरता बाहेर निघून जात होते. ही बाब गावाच्या दुष्काळाला कारणीभूत असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. पाणी अडविल्याशिवाय पातळी वाढणार नाही याची जाणीव त्यांना झाली. नंतर खोपडीची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता निवड झाली. दत्तात्रय राहाणे यांनी गावकºयांच्या साथीने पुढाकार घेतला अन् तेथूनच खºया अर्थाने गावाच्या विकासाला सुरुवात झाली.पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांनी गावकºयांना स्पर्धेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी गावात बैठक घेऊन गावकºयांचा उत्साह वाढविला. ८ एप्रिलला रात्री बारा वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. ५00 घनमीटर सीसीटी, तीन शेततळे, २00 मीटर दगडीबांध, १४00 मीटर कंटूर बांध, दहा एलबीएस, तर यंत्राने १७ हजार घनमीटर सीसीटी, १५ शेततळे, तीन गॅबियन बंधारे, दोन सिमेंट नालाबांध, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम पूर्ण झाले. यामुळे १३ कोटी ७१ लाख लिटर पाणीसाठा तयार झाला.इतर गावांना प्रेरणादायी वाटगावात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली. आता गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तर सुटलीच, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले. सर्वांनी एकदिलाने परिश्रम घेतले आणि यश संपादन केले. गावकºयांच्या घामाचा हा सुगंध अनेक वर्षे दरवळत राहील. खोपडीवासीयांचा हा प्रवास दुष्काळग्रस्त गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा आहे.तालुक्यातून प्रथम येण्यासाठी गावकरी या स्पर्धेत ईर्षेने उतरले. मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने हिरमोड झाला. तथापि यानिमित्ताने सर्वांच्या परिश्रमामुळे भरपूर कामे झाली. त्याचा चांगला लाभ गावाला होईल. ही बाब कोणत्याही पुरस्कारापेक्षा निश्चितच मोठी आहे.- दत्तात्रय राहणे, खोपडी.