शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु आॅक्टोबरमधील प्रचंड गर्मी आणि पावसाने वेळेवर मारलेली दडी यामुळे सोयाबीन व कापूस ही जिल्ह्यातील मुख्य पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था असताना शासनाचे अधिकारी कर्मचारी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या कुणाचेही लक्ष नाही. यावर्षी सुरूवातीला काही प्रमाणात पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी संकट कोसळले. यातून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने दगा दिला. त्यातच वापश्याच्या महिन्यामुळे पिके करपायला लागली आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर, कापूस पिकांवर दिसून येत आहे. अनेकांच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या आहे. सिंचानाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत कसीबसी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. जुन, जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसाने खरीपातही वाताहत केली. आगस्टच्या मध्यात कोसळलेल्या पावसाने खरीप पिकांमध्ये काहीप्रमाणात सुधारणा दिसून आली होती. अनेकांच्या शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकांमुळे शेतकऱ्यांच्या आकांक्षांना पिकांबरोबरच पालवी फुटली होती. परंतु त्यानंतर पोळ््यापासून आतापर्यंत पावसाने त्यांची मोठी निराशा केली, त्यामुळे पिके करपून गेली. आॅक्टोबरमध्ये वाढत्या तापमानामुळे शेतांना प्रचंड भेगा पडून खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. सोयाबीन काढणीला येत असतानाच आता त्याची दाणी भरण्याची क्षमता मंदावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे जिल्ह्यातील हजारो हेक्टेर पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. (प्रतिनिधी)