शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु आॅक्टोबरमधील प्रचंड गर्मी आणि पावसाने वेळेवर मारलेली दडी यामुळे सोयाबीन व कापूस ही जिल्ह्यातील मुख्य पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था असताना शासनाचे अधिकारी कर्मचारी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या कुणाचेही लक्ष नाही. यावर्षी सुरूवातीला काही प्रमाणात पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी संकट कोसळले. यातून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने दगा दिला. त्यातच वापश्याच्या महिन्यामुळे पिके करपायला लागली आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर, कापूस पिकांवर दिसून येत आहे. अनेकांच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या आहे. सिंचानाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत कसीबसी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही पूर्णपणे यश आलेले दिसत नाही. जुन, जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसाने खरीपातही वाताहत केली. आगस्टच्या मध्यात कोसळलेल्या पावसाने खरीप पिकांमध्ये काहीप्रमाणात सुधारणा दिसून आली होती. अनेकांच्या शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकांमुळे शेतकऱ्यांच्या आकांक्षांना पिकांबरोबरच पालवी फुटली होती. परंतु त्यानंतर पोळ््यापासून आतापर्यंत पावसाने त्यांची मोठी निराशा केली, त्यामुळे पिके करपून गेली. आॅक्टोबरमध्ये वाढत्या तापमानामुळे शेतांना प्रचंड भेगा पडून खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. सोयाबीन काढणीला येत असतानाच आता त्याची दाणी भरण्याची क्षमता मंदावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे जिल्ह्यातील हजारो हेक्टेर पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. (प्रतिनिधी)